एक्स्प्लोर

पंढरपुरातील चंद्रभागेचं पात्र अजूनही अस्वच्छ, लाखोंचा खर्च करुनही चंद्रभागेची दूरवस्था कायम; विठ्ठलभक्त संतप्त

Pandharpur News: लाखो वारकरी सांप्रदायाचे आराध्य असणाऱ्या चंद्रभागेची दूरवस्था झाल्याने भाविक संतप्त झाले आहेत

Pandharpur News : लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाचा ढोल वाजला. पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या (Pandharpur Chandrabhaga River) स्वच्छतेसाठी नगरपालिका आणि मंदिर समितीकडून लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे ज्या चंद्रभागेत लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करतात, ती चंद्रभागा स्वच्छ होईल असा लोकांचा समज झाला. मात्र आजही चंद्रभागेची दूरवस्था कायम आहे. त्यामुळे स्वच्छतेवरील लाखोंचा खर्च कचऱ्यात जात असल्याचं चित्र आहे.

दूषित पाण्यामुळे अंगाला खाज, त्वचा विकाराच्या तक्रारी

लाखो वारकरी सांप्रदायाचे आराध्य असणाऱ्या चंद्रभागेची अत्यंत दूरवस्था झाल्याने भाविक संतप्त असून घाणीत पवित्र स्नान करायचे असेल तर लाखो रुपयांचे ठेके कशाला असे संतप्त सवाल भाविक विचारु लागले आहेत. विठ्ठल दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक आधी चंद्रभागेत स्नान करुन मग दर्शनाला जातो. मात्र चंद्रभागा वाळवंटात असणारी घाण आणि पात्रात असणारा गाळ यामुळे मरण यातना सोसत लाखो विठ्ठल भक्तांना स्नान करावे लागते. यातच पाण्याला येणारी दुर्गंधी सहन करुन स्नान केल्यावर या दूषित पाण्यामुळे अंग खाजणे आणि त्वचा विकार होण्याच्या तक्रारी भाविक करत असतात. पण विठ्ठलाच्या भेटीला यायचे आणि चंद्रभागा स्नान न करुन कसे चालेल असा सवाल वारकरी विचारतात.

जोगदंड महाराज यांचे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांना खडे बोल

शासनाने चंद्रभागेच्या सफाई करण्याचे काम हाती घेण्याची मागणीही विठ्ठल भक्त करत आहेत. यातच राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध वाळू खड्ड्यात भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याने आता वारकरी शिक्षण संस्था आणि संत निरंकारी मंडळ अशा धार्मिक संस्था सफाईसाठी पुढे येत आहेत. दर महिन्याला जोगदंड महाराज यांच्या या वारकरी शिक्षण संस्थेतील लहान मुले सफाई करतात. मात्र मंदिर समितीकडून लाखोंचे ठेके घेतलेले ठेकेदार काय करतात किंवा नगरपालिका प्रशासन काय करते याचे यावर मिलीभगत असलेले प्रशासन मूग गिळून गप्प बसते. म्हणूनच आता जोगदंड महाराज यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांना खडे बोल सुनावले.

चंद्रभागा साफ केली तर पुन्हा आषाढी आणि कर्तिकीचा पूजेला येता येईल असे जोगदंड महाराज यांनी सांगितले आहे. खरे तर चंद्रभागेत दूषित पाणी आणि अवैध वाळू उपशावर कायमस्वरुपी तोडगा निघावा ही वारकरी संप्रदायाची मागणी असून यासाठीच जोगदंड महाराज यांनी फडणवीस यांना त्यांच्या नमामि चंद्रभागा प्रकल्पाची आठवण करुन दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

सुब्रमण्यम स्वामींची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
विठ्ठल मूर्तीची झीज! रासायनिक लेपणास जिल्हा न्यायालयाचा हिरवा कंदील, आषाढी यात्रेनंतर करणार प्रक्रिया 
विठ्ठल मूर्तीची झीज! रासायनिक लेपणास जिल्हा न्यायालयाचा हिरवा कंदील, आषाढी यात्रेनंतर करणार प्रक्रिया 
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
पार्थ पवारांना केंद्रात मंत्रिपद दिल्यास पक्षाची ताकद वाढेल, मंत्री बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य, म्हणाले, अर्थमंत्रीपद हे राष्ट्रवादीचेच
पार्थ पवारांना केंद्रात मंत्रिपद दिल्यास पक्षाची ताकद वाढेल, मंत्री बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य, म्हणाले, अर्थमंत्रीपद हे राष्ट्रवादीचेच

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
Embed widget