एक्स्प्लोर

Jayant Patil on Vishalgad : कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल; विशाळगड हिंसाचारावरून जयंत पाटलांची टीका

तेथील लोकांची घरदारं फोडून तिजोरी लुटून त्यातील संपत्ती नेण्यात आली, हे शिवप्रेमीचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठून तरी आलेल्या ठिकाणावरून हे गुंड आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

सोलापूर : विशाळगडच्या पायथ्याला झालेली घटना अतिशय गंभीर असून पायथ्याशी असलेल्या लोकांना वरती जाऊ न दिल्याने तेथील धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आला. तेथील लोकांची घरदारं फोडून तिजोरी लुटून त्यातील संपत्ती नेण्यात आली, हे शिवप्रेमीचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठून तरी आलेल्या ठिकाणावरून हे गुंड आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशातील जयंत पाटील यांनी केली. 

खरी वाघनखे साताऱ्याच्या जल मंदिरामध्ये आहेत

जयंत पाटील विशाळगड हिंसाचारावर संताप व्यक्त करताना म्हणाले की जर अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली, तर राज्यात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे सरकारचं हे मोठं अपयश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जयंत पाटील यांनी वाघनखांवरूनही सुद्धा महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या म्हणण्यानुसार खरी वाघनखे साताऱ्याच्या जल मंदिरामध्ये आहेत. मात्र, लंडनवरून आणलेली वाघनखं एवढ्या गुप्ततेत का आणली गेली? अशी विचारणा त्यांनी केली. 

ती वाघनखं मागच्या दारांनी पोहोचली देखील आहेत. मात्र, वास्तविक मुंबईपासून साताऱ्यापर्यंत या वाघनखांचे स्वागत करायला हवे होते. साताऱ्यात ज्या वस्तूसंग्रहालयात उद्धघाटन सरकार करणार आहे त्याला सरकारने तिकीट लावल्याचे पाटील म्हणाले. सरकारने वाघनखं भाड्याने आणली असून ती वाघनखं मिळवलेली नाहीत, ती तात्पुरत्या स्वरूपात आणली असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

चर्चा आणि मुदतवाढीचे गुऱ्हाळ सरकार किती महिने चालू ठेवणार?

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे जीआरवर बोलताना जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला, तर उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाशी संवाद साधून काय आश्वासन दिलं आहे ते माहिती नाही. यावर सरकारने बऱ्याच चर्चा केल्या आहेत. त्यामुळे सरकारने निर्णयापर्यंत यायला हवं. सरकार निर्णय घेण्यात सक्षम आहे. त्यांनी विरोधकांना बोलवून काय निर्णय घेतला हे सांगितले पाहिजे. चर्चा आणि मुदतवाढीचे गुऱ्हाळ सरकार किती महिने चालू ठेवणार? असे विचारणा त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Embed widget