एक्स्प्लोर

ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच

गावातील ग्रामस्थ दत्तात्रय शिंदे यांचे संपूर्ण घर पाण्याखाली होते. मात्र, लाखो रुपयाचे नुकसान होऊन देखील शासनाने अद्याप एक रुपयाची मदत दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे (Farmers) मोठे नुकसान झाल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज देखील जाहीर केले. मात्र, अद्यापही काही गावात, काही घरांना, ग्रामस्थांना शासनाची मदत मिळालीच नाही. अनेक गावात लाडक्या बहिणींना भावाची ओवाळणी मिळालीच नाही. सीना नदीला आलेल्या महापुराचा (Flood) सर्वात जास्त फटका राहुल नगर अर्थात सुलतानपूर या गावाला बसला होता. संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्याने येथे कुठल्याच मार्गाने पोहोचणे अशक्य बनले होते. संपूर्ण गाव पाण्याखाली जाऊन देखील घरांच्या नुकसानीची कोणतीही मदत अद्याप दिवाळी (Diwali) संपेपर्यंत देखील या गावापर्यंत पोहोचलेली नसल्याचे दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. 

गावातील ग्रामस्थ दत्तात्रय शिंदे यांचे संपूर्ण घर पाण्याखाली होते. मात्र, लाखो रुपयाचे नुकसान होऊन देखील शासनाने अद्याप एक रुपयाची मदत दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांचा दीड एकर ऊस जमिनीसह वाहून गेल्यानंतर पिक नुकसानीचे अकरा हजार दोनशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दुसरीकडे अशीच अवस्था नामदेव शिंदे या तरुण शेतकऱ्यांची असून त्याच्या खात्यावर देखील दीड एकर शेतीच्या नुकसानीचे पैसे जमा झाले आहेत. मात्र, घरच्या नुकसानीचे कोणतेही नुकसान भरपाई शासनाकडून आलेली नाही. यंदाची दिवाळी लोकांच्या मदतीवरच कशीतरी केल्याचे दत्तात्रय शिंदे सांगतात. त्यामुळे, शासनाच्या मदतीचा घोळ आता समोर येऊ लागला असून संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. मात्र, दिवाळीपूर्वी मदत जाहीर करणार असल्याचे सांगत सरकारने बळीराजाला, नुकसानग्रस्ताना आश्वासन दिले. मात्र, आज भाऊबीज, दिवाळी संपत आल्यानंतर देखील घराच्या नुकसानीचे पैसे सुलतानपूरमधील गावाकऱ्यांना मिळालेले नाहीत.

महापुराने दणका दिलेल्या माढा तालुक्याच्या दारफळ येथील बोराटे वस्तीमधील लोकांनाही अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. त्यामुळे या दिवाळीला ना पोरांना नवीन कपडे मिळाले, ना फटाके, ना फराळाचे गोडधोड पदार्थ, मात्र यंदा दिवाळी नसल्याचे सांगताना या चिमूरड्यांच्या चेहऱ्यावरील दुःखही लपून राहिले नाही. दारफळ या गावी खरे तर मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. ज्या ठिकाणी 126 लोक अडकले आणि त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर बोलवायची वेळ आली तीच ही बोराटे वस्ती. घरावर तीस फूट पाणी असलेल्या येथील अनेक लोकांना अद्याप शासनाची कसलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळेच चिमूरड्यांना ना फटाके, ना नवीन कपडे न फराळाचे पदार्थ. आमच्याकडे दिवाळी नाही असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख मात्र लपत नाही. आज दिवाळीचा शेवटचा दिवस मात्र अजूनही दारफळ मधली कुटुंब शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा

बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Digital Arrest: 'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
Nitish Kumar: नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare  PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Digital Arrest: 'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
Nitish Kumar: नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
Saudi Arabia Bus Accident: सौदीत मक्काहून मदिनाला बसची डिझेल टँकरला धडक; हैदराबादमधील एकाच कुटुंबातील 18 जणांचा झोपेतच जळून कोळसा; अवघा एकजण जिवंत बचावला
सौदीत मक्काहून मदिनाला बसची डिझेल टँकरला धडक; हैदराबादमधील एकाच कुटुंबातील 18 जणांचा झोपेतच जळून कोळसा; अवघा एकजण जिवंत बचावला
शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण
शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण
Baramati Nagar Parishad Election: अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवारी देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवार देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, मोहम्मद शमीकडून रणजीत धमाका सुरुच, दुसऱ्या कसोटीसाठी बोलावणं येणार?
टीम इंडियाचा आफ्रिकेविरुद्ध पराभव, शमीकडून रणजीत धमाका सुरुच, दुसऱ्या कसोटीसाठी बोलावणं येणार?
Embed widget