एक्स्प्लोर

फडणवीस सरकारच्या काळातील 'चांदा ते बांदा' महत्त्वाकांक्षी योजना पुन्हा सुरू होणार : दिपक केसरकर

Sindhudurg News : चांदा ते बांदा ही संपूर्ण महाराष्ट्रासाठीची महत्त्वाकांक्षी योजना पुन्हा सुरू होणार असून टप्प्याटप्प्यानं इतरही जिल्ह्यांना यात समाविष्ट करून घेणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

Sindhudurg News : राज्यात 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि चंद्रपूर (Chandrapur) या दोन जिल्ह्यांसाठी चांदा ते बांदा योजना आणली होती. या योजनेचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर (Deepak Kesarkar) चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे होते. या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकरी, मच्छिमार, कलावंत, उद्योजक या सर्वांनाच होत होता. त्यामुळे ही योजना तळापर्यंत पोहोचली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी अवजारं या योजनेतून मिळू लागली. मच्छीमारांना मासे टिकवण्यासाठीची सामग्री, बोटी, मच्छीमारी जाळी यासाठीसुद्धा लाभ होऊ लागला. तर आंबा बागायतदार आणि इतर उद्योजक यांना देखील या योजनेचा चांगला लाभ झाला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना तळागाळापर्यंत पोहोचली होती.

राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार आलं आणि या या सरकारनं देवेंद्र फडणवीस यांची चांदा ते बांदा ही योजना बंद करून फक्त कोकणासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यासाठी रत्नसिंधू ही योजना आणली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चांदा ते बांदा ही योजना बंद करून त्या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी रत्नसिद्ध ही योजना घोषित केली. मात्र ती अमलात येईपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार कोसल आणि आता राज्यात शिंदे सरकार आलं. मात्र शिंदे सरकार आलं तरीदेखील रत्न सिंधू साठी अजूनही निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या योजनेसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारलं असता त्यांनी रत्नसिंधूमध्ये चांदा ते बांदा योजनेचे पैसे खर्च करून काही काळातच पुन्हा एकदा चांदा ते बांदा ही योजना कार्यान्वित करणार असल्याचे म्हटलं आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना रत्नसिंधू ही योजना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी आणली होती. त्या योजनेला शिंदे सरकार ब्रेक देणार आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंना एक धक्का मानला जात आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोकण आहे आणि याच कोकणासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी चांदा ते बांधा ही योजनेला ब्रेक देऊन रत्नसिंधू ही योजना आखली. याचा फायदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, मच्छीमाराने वर्ग, युवकांना होणार होता. मात्र सरकार बदललं आणि महाविकास आघाडीच्या काळात झालेले निर्णय देखील बदलण्यात येत आहेत. यात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी असलेली योजना चांदा ते बांदा पुन्हा एकदा कार्यरत करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा धक्का मानला जात आहे.

चांदा ते बांदा ही योजना संपूर्ण राज्यासाठी आहे. पहिला टप्प्यात चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश केला होता. मात्र टप्प्याटप्प्यानं त्या योजनेत राज्यातील इतरही जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे रत्नसिंधू ही दोन जिल्ह्यांसाठी असणारी योजना बंद करून पुन्हा एकदा चांदा ते बांदा ही देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील योजना पुन्हा सुरू होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast :Pakistan मधील कुरापती, बहावलापूरच्या जैशच्या मुख्यालयात दहशतवाद्यांची गुप्त बैठक -सूत्र
Delhi Blast Probe: 'आत्मघाती हल्ला नाही, घाबरून कच्च्या स्फोटकांचा स्फोट', NIA सूत्रांची माहिती
Delhi Blast : जैशच्या फरिदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाईंड अम्मार अल्वी?, यंत्रणांकडून कसून तपास
Delhi Blast Probe: लाल किल्ला स्फोटामागे डॉक्टर मॉड्यूल? J&K मधून Dr. Tajamul ताब्यात, आकडा 6 वर
Terror Module घटस्फोटानंतर संबंध नाही, Delhi स्फोटातील Dr. Shaheen च्या पूर्वाश्रमीच्या पतीचा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
Embed widget