एक्स्प्लोर

Raju Shetti: 'स्वाभिमानी'च्या शेतकरी जागृती अभियानाला रायगडावरुन सुरुवात; राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडी, राजू शेट्टींची खरमरीत टीका

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच स्वाभिमानीचे पदाधिकारी अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती केली जाणार असल्याचे राजू  शेट्टी यांनी रायगडावरून सांगितले.

Raju Shetti: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज (1 जुलै) दुर्गराज रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियानाची (Farmer awareness campaign) सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी व शेकडो शेतकरी किल्ले रायगडावर उपस्थित होते. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम बेगडी असल्याची खरमरीत टीका केली. 

'स्वाभिमानी'कडून शेतकरी जागृती अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर संपूर्ण राज्यात सर्व पिकांचा उत्पादन खर्च, सरकारला मिळणारा कर, शेतकऱ्यांना मिळणारा भाव व वाढलेल्या महागाईमुळे शेती उत्पादनावर झालेला परिणाम या सर्व बाबींचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. शिवारापासून ते गावातील वाडी वस्तीपर्यंत सभा बैठका घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच स्वाभिमानीचे पदाधिकारी अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती केली जाणार असल्याचे राजू  शेट्टी यांनी रायगडावरून सांगितले.

स्वदेशी लुटारुंच्या विरोधात शेतकरी, कष्टकरी, सामान्य लढतोय

अनेक नेते रायगडावर येऊन आशीर्वाद घेतात, पण त्यांना सत्ता प्राप्त करायची आहे. यांना शिवरायांच्या आज्ञापत्राची यांना विसर पडला आहे. राज्यकर्ते सांगतात, प्रजा आपलीच आहे, जेवढी लुटता येईल तेवढी लुटा, पण याद राखा आमचा हिस्सा आला पाहिजे, अशी स्थिती आहे. स्वदेशी लुटारुंच्या विरोधात शेतकरी, कष्टकरी, सामान्य लढतोय, त्याच्या लढ्याला यश द्या, ही कैफियत घेऊन रायगडावर आलो आहे त्याला यश द्या, अशी साद राजू शेट्टी यांनी रायगडावरुन घातली. 

धोरणांच्या बाबतीत फक्त बैठकीचा फार्स  

किल्ले रायगडावर राजसदर, होळीचा माळ तसेच समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर राजू शेट्टी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, शेतकऱ्यांसाठीची निती याची उदाहरण देत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. राजू शेट्टी म्हणाले की, राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडी आहे. दहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही. सरकार शेतकऱ्यांच्या धोरणांच्या बाबतीत फक्त बैठकीचा फार्स करते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात जुन्या योजनांचे अनुदान, कृषी साहित्य वाटप अथवा शासकीय योजनांची जत्रा भरवली जात असून त्यातून शेतकरी प्रेम दाखविले जात आहे. 

शेतकरी ज्या वेळेला संकटात उभा होता, तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना उभ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिली कर्जमाफी, दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी-बियाणे,अनुदान देणे, गोदामाची कोठारी उभा करणे बैल जोडी, बंधारे, विहीरी, शेती साहित्य यासारख्या वस्तू मोफत वाटणे यामाध्यमातून पायाभूत सुविधा सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र

व्हिडीओ

Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Embed widget