एक्स्प्लोर

Pune News : देशातील शेवटच्या टाडा खटल्याचा निकाल जाहीर; सुरेश दुबे खून प्रकरण, भाई ठाकूर यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता

बांधकाम व्यावसायीक सुरेश दुबे यांच्या खून प्रकरणी भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर, यांची पुणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.  देशातील शेवटच्या टाडा खटल्यात पुणे न्यायालयाने हा निकाल जाहीर केला आहे.

Pune News : बांधकाम व्यावसायीक सुरेश दुबे यांच्या खून प्रकरणी भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर, यांची पुणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. देशातील शेवटच्या टाडा खटल्याचा पुणे न्यायालयाने हा निकाल जाहीर केला आहे. विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकावर सुरेश दुबे यांचा 34 वर्षापूर्वी खून झाला होता. याप्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील सतीश मिश्रा यांनी कामकाज पाहिले.

यापूर्वी याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सहा जणांना जन्मठेप सुनावलेली आहे. 34 वर्षांपूर्वी ही हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर आज अखेर टाडाचा शेवटचा निकाल लागला आणि तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात येणार आहे. भाई ठाकूर यांच्यासह इतरांवर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांनी सुरेश दुबे यांना धमकावल्याचा आरोप आहे शिवाय त्यांच्यावर दबाव टाकल्याचा देखील आरोप आहे. सुरेश दुबे यांनी जागेचा ताबा सोडावा आणि हफ्ता द्यावा. अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी तेव्हा देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागा रिकामी करुन द्यावी, यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे सुरेश दुबे यांनी वकिलांतर्फे ठाकूर यांना नोटीसही पाठवली होती. त्यानंतर 9 ऑक्टोबर 1989 रोजी बिल्डर दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत असतानाच त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

भाई ठाकूर यांच्यासह पाच जणांवर टाडा खटला

हे देशातील शेवटचं टाडा प्रकरण होतं. या खटल्यात 102 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासोबतच पाच जणांवर टाडा खटला चालवण्यात आला. 1992 मध्ये यातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. सन 2005 मध्ये हा खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरु झाली होती.

सहा ते सात आरोपींनी झाडल्या होत्या गोळ्या

34 वर्षांपूर्वी म्हणजेच 9 ऑक्टोबर 1989 हा सुरेश दुबेंसाठी काळा दिवस ठरला. सुरेश दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत होते. त्याच वेळी त्यांचा पाठलाग करत असलेले सहा ते सात आरोपींनी त्यांना हेरलं आणि गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आरोपींवर टाडा लावण्यात आला होता. टाडा कायदा (Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act) 1985 ते 1995 दरम्यान लागू होता. पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे सुरक्षा दलांना विशेष विशेषाधिकार देण्यासाठी हा कायदा आणण्यात आला होता. याच कायद्याचा शेवटच्या खटल्याचा निकाल लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget