एक्स्प्लोर

निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा : संजय राऊत

ठाकरे सरकार कोसळेल यासाठी पैजा लागल्या होत्या. सरकार पूर्णपणे ताकदीने चालणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे सरकार पडेल असं दिल्लीतील कोणी म्हणत नाही, हे स्वबळावरच सरकार आहे, असंही ते म्हणाले. ते आज पुण्यात बोलत होते.

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याची टीका केलीय. बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार राऊत यांनी ही टीका केली आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाकडून बिहार मधील नागरिकांना मोफत लस देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाजपच्या या आश्वासनाच्या विरोधात विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती आणि भाजप वर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आणि भारतीय जनता पक्षाने दिलेले मोफत आश्वासन हे आयडियल कोड ऑफ कण्डक्टचे उल्लंघन नसल्याचं म्हटलं. यावरती प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याचं म्हटलंय.

काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा

खासदार संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापासाठी पुण्यात आले होते. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे स्थिर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचं वक्तव्य परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे. त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारलं असता नांदेड महापालिकेचा विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील असं म्हटलं आणि काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा असल्याचं सांगितलं.

त्याच बरोबर बारा विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी कोणती आहे याबद्दलही संजय राऊत यांना विचारला असता माध्यमांमधूनच वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असल्याचं आणि प्रत्येक न्यूज चॅनेलकडून एक वेगळी यादी दाखवली जात असल्याचं म्हटलं. ऊर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेने ऑफर दिली आहे का याबद्दल स्पष्ट बोलण्याचं संजय राऊत यांनी टाळलं, मात्र मुख्यमंत्री जर कोणाशी बोलणं करत असतील तर ती बाब गुप्त राहते, त्याची अशी सार्वजनिक चर्चा होत नाही असं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर शिवसेनेमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या शिवसैनिकांना बाजूला ठेवून नव्याने पक्षात आलेल्यांना संधी मिळत असल्याबद्दल ही संजय राऊत यांना पत्रकारांनी छेडलं. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत तर आता उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी घेतले जातंय. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असलेले शंकरराव गडाख हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तर दुसरे मंत्री राजेंद्र यड्रावकर हे देखील अपक्ष म्हणून निवडून आले आहेत या दोन अपक्षांना अनुक्रमे अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा पाया भक्कम करण्यासाठी मंत्रीपद देण्यात आले. सत्ता महत्त्वाची असते आणि त्यासाठी अशा लोकांना पक्षात सामावून घ्यावं लागतं असं संजय राऊत म्हणाले. या दोघांनाही निवडून येण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता असंही त्यांनी सांगितलं मूळ शिवसैनिक आणि नवीन शिवसैनिक असं काही नाही सगळे शिवसैनिकच आहे असेही संजय राऊत यांनी म्हटलंय.

शरद पवार प्रेम करावे असेच व्यक्तिमत्त्व शरद पवार सरकार चालवतात या चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांवर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार हे आजच्या घडीला देशातील प्रमुख, अनुभवी आणि संयमी नेते आहेत. शरद पवारांनी सरकारला सल्ला दिला तर पोटात काय दुखतं? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार प्रेम करावे असेच व्यक्तीमत्त्व आहे, असंही ते म्हणाले.

आरक्षणाच्या वादावर मोदींनी लक्ष घालायला हवं असंही ते म्हणाले. दोन्ही राजांनी पुढाकार घेऊन पंतप्रधान मोदींच्या दरबारात विषय न्यावा, आम्हीही पाठिंबा देऊ, असं ते म्हणाले.

राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. राजभवन ही घटनात्मक जागा, त्याची प्रतिष्ठा राखली जावी. राज्यपालांनी पवार यांच्याकडे पाठवण्याऐवजी पंतप्रधानांकडे पाठवावे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Pune News: मित्रांसोबत फिरायला गेला; अर्ध्या वाटेतूनच एकटा परतला, पार्किंगजवळ तो दिसलाच नाही..., दरीत चपला अन् घसरत गेल्याचे निशाण, नाणेघाटात नेमकं काय घडलं?
मित्रांसोबत फिरायला गेला; अर्ध्या वाटेतूनच एकटा परतला, पार्किंगजवळ तो दिसलाच नाही..., दरीत चपला अन् घसरत गेल्याचे निशाण, नाणेघाटात नेमकं काय घडलं?
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget