एक्स्प्लोर

राज्यातून 17 प्रकल्प गेले, मराठी लोकांचा घास पळवला, प्रकल्प रोखण्याची राणेंची हिंमत नाही, सरकारही लाचार; संजय राऊतांचा हल्लाबोल

Pune News : गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा, आमचं काहीच म्हणणं नाही. आधी गुजरातचा विकास आणि मग देशाचा विकास अशी भाषा देशाचे पंतप्रधान करतात..असं कुणीच कधी बोललं नाही.

Pune News : महाराष्ट्रातून आतापर्यंत 17 प्रकल्प बाहेर गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री खोटे आकडे देत आहेत. ते तोंड शिवून बसले आहेत. दहशतीखाली उद्योगपती यांना घेऊन चालले आहेत. मुंबईची (Mumbai) वाट लावण्याचे धोरण हे सरकार करत आहे. आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळून लावत आहेत. नरेंद्र मोदी (PM narendra modi) म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा, कुठल्याही पंतप्रधान यांनी असे भाष्य केले नव्हते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एका राज्याचे नाहीत. मी म्हणतो त्यांनी गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा, आमचं काहीच म्हणणं नाही. आधी गुजरातचा विकास आणि मग देशाचा विकास अशी भाषा देशाचे पंतप्रधान करतात..असं कुणीच कधी बोललं नाही.  आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाचार झाले आहेत. नारायण राणे यांच्यातही ताकद नाही की उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर बोलावे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते पुण्यात बोलत होते. नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनामध्ये होते ना तर त्यांनी तो बाणा दाखवावा. अजित पवार तुम्ही शरद पवार यांचे नाव सांगता, मग सांगा ना की राज्यातून एक ही प्रकल्प बंद होऊ देणार नाही म्हणून असेही राऊत म्हणाले. 

योग्य वेळी बोलू -

राम मंदिर सोहळा आनंदाचा क्षण आहे. देशाचा सोहळा पाहिजे हा तर आता भाजप सोहळा झाला आहे. भाजपने राम मंदिर सोहळा राजकीय केलाय. अक्षदा वाटत आहेत की जणू एक लग्न सोहळा आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेने बलिदान दिले त्याला आम्हाला कुठले ही गालबोट लावायचे नाही पण आम्ही योग्य वेळी बोलू, असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला. 
 
 मुंबईत कोण काय बोलतात यावर जाऊ नका 

महा विकास आघाडीमध्ये जिंकेल त्याची जागा आहे. जयंत पाटील यांनी शिवसेनेशी चर्चा केली आहे. जागा वाटपाचा संदर्भात कोणताही मतभेद नाही. मुंबईत कोण काय बोलतात यावर जाऊ नका, असे राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहेत. हुकुमशाही बदलून टाकण्यासाठी ते ठाम आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या सभा बघितल्या असतील तर ते लढाई मध्ये उतरले आहेत. सामंजस्य पणे ते भूमिका बजावत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. 

 हे सरकारचं अपयश -

शेतकऱ्यांची दुरावस्था ही सरकारचं हे अपयशच आहे. महाराष्ट्राचं सरकार जो मोदी मोदी करतायत, त्यातले शिंदे आणि अजित पवार कालपर्यंत त्यांच्या शेतकरी धोरणावर टीका करत होते. विदर्भात गेल्या दीड वर्षांत 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अजूनही जर हे सरकार म्हणत असेल की सगळं काही आलबेल आहे तर ते खोटं बोलतायत
गेल्या दोन वर्षांत काय केलं तर फक्त आमदार-खासदारांचा भाव वाढवला, असे संजय राऊत म्हणाले. 

महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा प्रयत्न

हे सरकारच रेव्ह पार्टी आहे. सरकार म्हणेजच रेव्हपार्टीतून निर्माण झालंय. अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येतायत. महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा प्रयत्न आहे. देशात भाजपचं सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटींचं ड्रग्स गुजरातच्या बंदरातून पकडलं आहे. तुम्ही या देशातील तरूणांना नशेत धुत करून राज्य करू इच्छिताय का? असे राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget