एक्स्प्लोर

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही : शरद पवार

पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली, तरी सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. आज पुण्यात वार्ताहर संमेलनात ते पत्रकारांशी बोलत होते. कोणत्याच मागण्या एकाचवेळी पूर्ण होत नसता, त्यामुळे उर्वरित मागण्यांसाठी आम्ही भविष्यात आग्रह धरु असे सूचक विधानही त्यांनी केलं. शिवाय कर्जमाफी हे एक पाऊल होतं. आता यापुढे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचं, त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय ग्रामीण सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे दोन हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा आहे. त्यामुळे त्या जमा करुन घेण्यासठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर कर्जमाफीची मर्यादा ही एक लाखावरून दीड लाखांवर नेली होती. त्यामुळे राज्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा दावा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या मनात खदखद

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, असं वक्तव्यं केलं होतं. पवारांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगून त्याला ऐतिहासिक आधार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते. त्याला ऐतिहासिक आधार आहे. अफझलखान हा शिवरायांनी मुस्लीम होता, म्हणून नाही तर स्वराज्याचा, रयतेच्या राज्याचा शत्रू होता म्हणून मारला. छत्रपती शिवरायांनी कधी जात, धर्माचा विचार केला नाही. अफझलखानाला जसा मारला. तसाच कृष्णाजी भास्कर यालाही मारला. स्त्रियांबाबत गैरवर्तन करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडले. बजाजी निंबाळकर ,जावलीचे मोरे अशा कित्येकांवर शस्त्र चालवली. त्यामुळे माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या मनात किती खदखद आहे हे यातून दिसून येतं.'' संबंधित बातम्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी PHOTO : 34 हजार कोटींची कर्जमाफी... छत्रपती शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते: शरद पवार

महत्त्वाच्या बातम्या

Pune Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांना जाग; पर्यावरण विभाग अन् कंत्राटदाराला नोटीस!
मोशी दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांना जाग; पर्यावरण विभाग अन् कंत्राटदाराला नोटीस!
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Pune Moshi Building Collapse: 'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
'यंदा वारीला गेले असते तर...'; मोशी दुर्घटनेत काळजाला घर पाडणारी कहाणी, अवघ्या 25 दिवसांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget