एक्स्प्लोर

Eknath Shinde In Purandar: मला निवडून येण्यासाठी कोणत्याही निशाणीची आवश्यकता नाही: एकनाथ शिंदे

आम्ही जर बंडखोर आणि गद्दार असतो तर महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं नसतं. एवढ्या मोठ्या संख्येने सभेला लोक आले नसते. याचा अर्थ आमची भूमिका या जनतेने स्वीकारली आहे.

Eknath Shinde In Purandar: आम्ही जर बंडखोर आणि गद्दार असतो तर महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं नसतं. एवढ्या मोठ्या संख्येने सभेला लोक आले नसते. याचा अर्थ आमची भूमिका या जनतेने स्वीकारली आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे फाईलींमध्ये काम करणारा नाही. सरकार बदललं आहे. बाळासाहेबांचं आणि प्रमाेद महाजनांंचं सरकार आलं आहे, त्यामुळे नक्कीच योग्य काम होईल, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे बोलत होते.

आपण सगळ्यांनी मतदान शिवसेना भाजपला मतदान केलं. या दोघांच्या युतीचं सरकार येणार या भावनेनं आपण निवडणूका लढवल्या. त्यानंतर जनतेनीही तोच कौल दिला. शिवसेनेचे 56 आणि भाजपचे 105 आमदार निवडून आले. बहूमत जनतेनं दिलं होतं. शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन होईल असं वाटतं होतं. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि समोरचं चित्र आपण सगळ्यांनी बघितलंच, असंही ते म्हणाले.

आतापर्यंतच्या इतिहासात लोक विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे जात असतात. आम्ही सत्तेत होतो. आमच्या सारखे मंत्री सत्ता सोडून पाय उतार झाले. मात्र मी सांगतो मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही एवढं काम मी मतदार संघात केलं आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 40 आमदार त्यांच्या मतदार संघातली कहाणी मला सांगत होते. मला बंड काहीच आवश्यकता नव्हती या सगळ्यांच्या समस्या ऐकून मी हा बंड केला. हे केलं नसतं तर येत्या निवडणुकांमध्ये हातावर मोडण्याइतकेच आमदार निवडून आले असते, अशी परिस्थिती निर्माण झाली असती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माविआ  सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांना मोठे निधी उपलब्ध झाले. त्यांनी कामाला सुरुवात केली. भुमिपुजनं केली. मात्र आमच्या नेत्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. आम्ही तक्रारी केल्या मात्र त्याचं काहीच झालं नाही. गेल्या २ वर्षात शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं.  शिवसैनिकांना खोट्या चौकशींना सामोरं जावं लागलं. शिवसैनिक जेलमध्ये जावं लागलं. त्यावेळी शिवसैनिकांना राष्ट्रवादीचे लोक बोलवून चौकशी गृहमंत्र्यांकडे लावू अशी लालसा दाखवण्यात आली, असेही आरोप त्यांनी केले आहे.

अन्याया विरुद्ध पेटून उठा, अशी बाळासाहेबांची शिकवण होती. त्याविरुद्ध आम्ही लढलो आणि जिंकलो.  सर्वांनी आमच्या ऐतिहासिक बंडाची नोंद घेतली. थोडं जरी काही झालं असतं तर आमचा कार्यक्रम झाला असता. एकनाथ शिंदे आणि 50 लोकांनी राजकीय आत्महत्या केली असं अनेकांना वाटत होतं. मात्र अशा परिस्थितीत आमचा प्रवास सुरु झाला अनेक उपमा आम्हाला दिल्या. मात्र विजय केसरकर यांच्या सारखा संत माणूस भेटला. त्यामुळे आमचा भार हलका झाला, असंही ते म्हणाले. 

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Heat Wave Weather Updates: काळजी घ्या! पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची लाट; 18, 19 तारखेला पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
काळजी घ्या! पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची लाट; 18, 19 तारखेला पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Ashok Kharat : परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget