एक्स्प्लोर

Devendra Fadanvis Pune: कोयता गँग ते पुरंदरचं विमानतळ; पुण्याबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोयता गॅंग ठेचून काढायला हवी, असं परखड मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे

Devendra Fadanvis Pune: पुण्यात कोयता गॅंगने (Koyta Gang) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोयता गॅंग ठेचून काढायला हवी. त्यांच्याविरोधात काही दिवसातच वेगळ्या पद्धतीने कारवाई होताना पाहायला मिळेल. दहशत ही पोलिसांचीच असायला हवी, असं परखड मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी व्यक्त केलं आहे. शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं आहे. 

पुणे विमानतळ हे पुरंदरलाच होणार 

पुणे विमानतळ हे पुरंदरलाच होणार यासाठी संपूर्ण परवानग्या घेतल्या होत्या. मात्र या आधीच्या सरकारने ते विमानतळ वीस किलोमीटर पुढं नेलं. त्या मागे चांगला हेतू असू ही शकतो. मात्र तिथं परवानग्या नाकारल्या गेल्या. पुण्यापासून 50 किमीवर विमानतळ करण्याला काही अर्थ नव्हता. कारण नवी मुंबईत ही विमानतळ आहे. अशा परिस्थितीत आधी ज्या जमिनीला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, तिथंच विमानतळ होणार आहे. आत्ताच्या विमानतळावर पोहचता पोहचता डोकेदुखी होते त्यासारखं या नव्या विमानतळावर पोहचताना डोकेदुखी होणार नाही. त्यामुळे पुणे विमानतळ हे पुरंदरला होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

नवी महापालिका निर्माण करुन प्रश्न सुटणार नाहीत...

पुण्यात केवळ नवी महापालिका निर्माण करून प्रश्न सुटणार नाहीत. कारण नवी महापालिका झाली तर तिथं करप्रणाली सुरू होणार, मग त्या तुलनेत सुविधा दिली जाते का? असा पहिला मूलभूत प्रश्न उभा राहतो. ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, त्यांची  इच्छा असेल तर पुणे अथवा पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यात येईल. अथवा त्या ग्रामपंचायतींची निर्मिती नगरपंचायतमध्ये करता येतील. मग पुढं जाऊन नव्या महापालिकेचा विचार होऊ शकतो. अशी प्रक्रिया असते, असंही ते म्हणाले.

पुण्याच्या पाण्याचं काय?

पुणेकर अधिक पाणी वापरतात असं आम्ही म्हणत नाही, पण कागदावर प्रति पुणेकर सर्वाधिक पाणी वापरतो, असं दिसून येतंय. आता जर पुणेकर पाणी वापरत नसतील तर मोठया प्रमाणात पाण्याची गळती होते अथवा याची चोरी होते. त्यामुळे याकडेदेखील लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बालगंधर्व रंगमंदिर बाबतीत पुनर्विकासचा विचार मागील काही दिवसांपासून सुरु आहे. त्यासंदर्भात  काही निर्णय घेतला तर उद्या माझ्या विरोधात मोर्चे निघतील. त्यामुळे याबाबत ही पुणेकरांनी ठरवावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

उद्योजकांकडून वसूली करणं हा धंदाच...

उद्योजकांकडून वसुली करणं हा धंदाच झाला आहे. या सगळ्या वसुली एजंटला धडा शिकवायला पाहिजे. त्यांना धडा शिकवण्याची मोहीम हाती घेतली आहे. लवकरच त्याचे परिणाम दिसणार आहेत. उद्योजकांना ही विनंती आहे की त्यांनी थेट गृह विभागाला, वेळ पडल्यास थेट मला कळवावं. तुमचं नाव पुढं येणार नाही. पुणे जिल्ह्यात आलो की वसुली होते, गुंडागर्दीला सामोरं जावं लागतं. हे चित्र बदलणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातमी-

Purandar Airport News: मोठी बातमी! पुरंदर विमानतळाला जागा देण्यास गावकऱ्यांचा नकार; गावकरी देवेंद्र फडणवीसांकडे देणार निवेदन

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget