एक्स्प्लोर

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुण्यात राहणं का शक्य नाही?

24 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला, पण या विद्यार्थ्यांचं जेवणाचाच प्रश्न आहे. सुरुवातीचे काही दिवस हे विविध संघटनांनी जेवण दिलं. पण ते किती दिवस पुरणार? एमपीएससी स्टुडंट राईट असोसिएशन बाकी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या विद्यार्थींना दोन वेळचं जेवण पुरवण्याचा उपक्रम सुरु केला.

पुणे : मुळचा परभणीचा असलेला नागनाथ भालेराव पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी आला होता. पार्ट टाईम जॉब करुन स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करायचा, असं त्याचं दिनक्रम होता. पण आता कोरोनाच्या संकटाने सगळंच बदलून गेलं आहे. पोट रिकामं असेल तर कसा अभ्यास करणार? मी दत्तवाडी परिसरात राहतो. हॉटस्पॉट असल्याने हा सगळा भाग सील केला आहे. सकाळपासून काही खायला नाही. मदत म्हणून मिळत असलेलं फूड पॅकेट घ्यायला कित्येक किलोमीटर चालत जावं लागतं. कसं राहणार आम्ही इथे? का राहायचं? नागनाथ बोलताना म्हणाला.

माझ्या घरचे मोलमजूरी करतात. लॉकडाऊनमुळे त्यांचंही काम बंद आहे. ते मला पैसे पाठवू शकत नाहीत. मी कसं राहणार पुण्यात? नागनाथ म्हणाला. फक्त नागनाथच नाही तर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागतोय आणि म्हणून सरकारने आम्हाला आमच्या घरी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत.

पुण्यात संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येतातच. पण फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. सुमारे एक लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्यात आहेत. यातील काही विद्यार्थी लॉकडाऊनच्या आधी घरी गेले. लॉकडाऊनच्या या काळात पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची आम्ही यादी करतोय आणि हा आकडा आता 2300 वर गेला आहे, एमपीएससी स्टुडंट राईट असोसिएशनचा महेश बडे याने ही माहिती दिली.

24 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला, पण या विद्यार्थ्यांचं जेवणाचाच प्रश्न आहे. सुरुवातीचे काही दिवस हे विविध संघटनांनी जेवण दिलं. पण ते किती दिवस पुरणार? एमपीएससी स्टुडंट राईट असोसिएशन बाकी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या विद्यार्थींना दोन वेळचं जेवण पुरवण्याचा उपक्रम सुरु केला. तो आतापर्यंत सुरु आहे. पण आमची ताकद ही 3 मे पर्यंतच आहे. त्यानंतर काय करायचं यांनी? महेश बडेने सांगितलं.

कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अनिश्चिततेच सावट आहे. 15 मार्चला एमपीएससाकडून घेण्यात येणारी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठीची परिक्षा होती. तोपर्यंत पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि कोरोनाच्या सावटाखालीच ही परीक्षा पार पडली. राज्य आयोगची पूर्व परीक्षा 4 एप्रिलला होणार होती. पण मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना फैलावत गेला होता. पुणे शहरातील शाळा, कॉलेजेस बंद झाले होते. याचसोबत स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिकाही ओस पडू लागल्या होत्या. त्यानंतर शहरातील खानावळी बंद होऊ लागल्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात राहताना प्रामुख्याने अभ्यासिका आणि खानावळींवर अवलंबून असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आपआपल्या गावाचा रस्ता धरला. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचं 4 एप्रिलला होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठीचं परिक्षा केंद्र हे पुणे होतं. पण अभ्यास आणि जेवणाचीच आबाळ व्हायला लागल्यावर तोपर्यंत काय होतं ते बघू, असं म्हणून काही विद्यार्थी घरी गेले.

या सगळ्या अस्थिर परिस्थितीमध्ये ही परिक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होऊ लागली. ही परीक्षा पुढे ढकलून 26 एप्रिलला होईल, असं सांगण्यात आलं. पण तोपर्यंत प्रवासाचे साधनं उपलब्ध नव्हते. आता तर सगळ्याच परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संदिग्ध मनस्थितीमध्ये पुण्यात राहिलेल्या विद्यार्थ्यांचे घरी जायचे सगळे रस्तेच बंद झाले. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी पुण्यात येतात. यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. पुण्यामध्ये शेअरिंग रुम घेऊन हे विद्यार्थी राहतात. या शेअरिॅग रुममध्ये स्वयंपाक करण्याची सोयही नसते.

लॉकडाऊनमुळे सगळं बंद झाल्यावर पुण्यात अडकलेल्या या विद्यार्थ्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. खोलीचं भाडं कसं भरायचं? जेवणाची सोय कशी करायची? परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्यावर आता इथे राहून काय करायचं असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. भविष्याचा कोणताही विचार नाही केलाय आत्ता. आम्हाला फक्त घरी जायचं आहे. आता या परिस्थितीमध्ये पुण्यात नाही राहू शकत, नागनाथ भालेरावने सांगितलं. बुलढाण्याचा अमोल वानखडेही घरी जाण्यासाठी उत्सुक आहे. माझे घरचे काळजी करतात. कसं राहायचं इथे? आमच्या आरोग्यालाही इथे राहून धोखा आहे. जर सरकार कोट्यातला मुलांना इथे यायला परवानगी देऊ शकतं तर राज्यातला राज्यात जायला परवानगी द्यायला हवी, असं अमोलने सांगतलं. कोट्याच्या धर्तीवर आम्हालाही घरी जाऊद्या, असं या विद्यार्थांचं म्हणणं आहे. गावाकडे जाऊन हवंतर 14 दिवस क्वारंटाईन राहतो. पूर्ण काळजी घेऊन राहतो पण घरी जाऊ द्या, अशी विनवणी हे विद्यार्थी करत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nasrapur Girl Death : नसरापूर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, सहा अधिकाऱ्यांची टीम स्थापन
नसरापूर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, सहा अधिकाऱ्यांची टीम स्थापन
Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Pune News: पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
Nasrapur: पुण्यातील नसरापूर प्रकरणी रितेश देशमुखचा संताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेची आठवण, म्हणाला..
पुण्यातील नसरापूर प्रकरणी रितेश देशमुखचा संताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेची आठवण, म्हणाला..

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
Embed widget