एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : आदित्य ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यावर काय म्हणाले मंत्री सुधीर मुनगंटीवार?

Sudhir Mungantiwar : आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Sudhir Mungantiwar : कुणाच्याही गाडीवर हल्ला होता कामा नये. मग ते किरीट सोमय्या असो किंवा आदित्य ठाकरेंची असो.  किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून रडीचा डाव कुणी केला? गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? हे बघितले पाहिजे.. जेव्हा आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा आहे. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा. अशा घटनांना राजकीय  स्वरूप देणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. ते आज बारामतीमधील माळेगाव येथील बोलते होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. 

मोदीजी जेव्हा बारामतीत आले, तेव्हा एखादे उत्तम काम असेल, तर त्याची कौतुक करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. मी सुद्धा एखादे चांगले काम करतो, तेव्हा हे जे विरोधक आहेत, तेही कौतुक करत होते. ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे, ती खंडित होता कामा नये. हे खरे आहे की, चुकीच्या बाजूचे कोणीही समर्थन करू नये . जी बाजू चुकीची आहे, ज्यामध्ये अन्याय अत्याचाराचा भाव आहे त्याचे समर्थन देखील करता कामा नये. मात्र एखाद्या पक्षात जर एखादे चांगले असेल तर त्याचे समर्थनही करण्यास मागे पुढे पाहू नये, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

विधान परिषद शिक्षक मतदार संघ पराभवावर काय म्हणाले मुनगंटीवार ?

भाजपचे नेहमीच मंथन चालू असते. हे विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही अशा भूमिकेतून भाजप चालते. आम्ही इतके वर्ष सत्तेच्या बाहेर होतो, मात्र जनतेचा आवाज बुलंद करत होतो. संसदीय आयुधांचा वापर करत होतो. शेवटी आम्हाला जी शिकवणूक आहे ती, सत्तेसाठी काहीपण; असे नाही तर सत्यासाठी काही पण अशी आहे. आम्ही निवडणूक जिंकलो की हरलो याच्यापुरतं आमचं काम चालत नाही. आमचे लक्ष हे देशातील गरिबांच्या आयुष्यातील अंधार बाजूला करण्याचे आहे. चार निवडणुका हरल्या म्हणजे काहीतरी गडबड झाली, असे समजायचे कारण नाही. ठीक आहे आमचा पराभव झाला. आम्ही त्याचे समर्थन नक्की करू आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही उभारी घेऊ, असे मंत्री मुनगंटीवार

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामान्यावरही बोलले, म्हणाले....

काँग्रेसच्या अंतर्गत बाबीमध्ये मी का लक्ष घालू ? मात्र त्या पक्षाचेही एकमेकांचे पाय ओढण्याची परंपरा आहे. भाजपची जवळक असल्याचे वाटत नाही, त्यांच्या पक्षामध्ये ही मोठी परंपरा आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची त्या परंपरेचे जे जे पाईक आहेत ते ते पुढे जातील. त्याच्यासाठी आम्ही काय बोलायची कारण नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

कृषी विज्ञान केंद्राची पाहणी -

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. मुनगंटीवार यांनी कृषी विज्ञान केंद्रासह कृषी महाविद्यालय आणि डेअरी ऑफ  एक्सलन्सची देखील मुनगंटीवार यांनी पाहणी केली. बारामतीमध्ये होणारे कृषी प्रदर्शन हे मुनगंटीार यांना घ्यायचे आहे. म्हणून बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत आले होते. त्यावेळी मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्यावेळी बारामतीतून निघत होते त्यावेळी त्यांना बारामती चांगली आहे का असं प्रश्न विचारला असता चंद्रपूर आमचं चांगला आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

सूर्यप्रकाशावर लाईट निर्मिती केली पाहिजे -
चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रदर्शन भरावयचे आहे. या भागातील टेक्नॉलॉजीचा वापर तिकडे कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. अमेरिकेत भरड धान्याचे उत्पन्न जास्त आहे. पंजाब सरकारने लाईट फुकट दिली होती आणि कालांतरानं त्यांची आर्थव्यवस्था ढासळली. सूर्यप्रकाशावर लाईट निर्मिती केली पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले ?

मंत्रिमंडळ विस्तार झालं नाही म्हणून राज्य थांबले का? निवडणुका झाल्या नाहीत म्हणून काम थांबली का? 20 मंत्र्यांनी अनेक निर्णय घेतला. आजपर्यंत निर्णय झाले नाही ते निर्णय या सरकारने घेतले आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.  सत्ता संघर्षचा निकाल लागेल. मी कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी केली नाही आणि राजकीय पक्षाची शकले होताना मी पाहिले नाहीये. जे नियमानुसार आहे ते होईल अशी आशा आहे, असेही ते म्हणाले. 

अजित पवार आज म्हणत आहेत अधिवेशनाचा कालावधी वाढावा हे मी 2 वर्ष म्हणत होतो, तेच आता अजित पवार म्हणत आहेत. अधिवेशनाचा कालावधी वाढवून जनतेच्या हिताची कामे झाली पाहिजेत. तसं झालं तर 4 आठवडे घेऊ, असे मुनगंटीवार यांनी सांगितलं.  

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात काय म्हणाले?

कुणाच्याही गाडीवर हल्ला होता कामा नये. मग ते किरीट सोमय्या असो किंवा आदित्य ठाकरेंची असो.  किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून रडीचा डाव कुणी केला? गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? हे बघितले पाहिजे.. जेव्हा आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा...  अशा घटनांना राजकीय  स्वरूप देणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Ajit Pawar and Jay Pawar: अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच शेवटी त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
Ajit Pawar Birth Anniversary: अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी पालिकेत नेमकं काय घडलं?
अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी पालिकेत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget