एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : आदित्य ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यावर काय म्हणाले मंत्री सुधीर मुनगंटीवार?

Sudhir Mungantiwar : आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Sudhir Mungantiwar : कुणाच्याही गाडीवर हल्ला होता कामा नये. मग ते किरीट सोमय्या असो किंवा आदित्य ठाकरेंची असो.  किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून रडीचा डाव कुणी केला? गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? हे बघितले पाहिजे.. जेव्हा आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा आहे. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा. अशा घटनांना राजकीय  स्वरूप देणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. ते आज बारामतीमधील माळेगाव येथील बोलते होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. 

मोदीजी जेव्हा बारामतीत आले, तेव्हा एखादे उत्तम काम असेल, तर त्याची कौतुक करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. मी सुद्धा एखादे चांगले काम करतो, तेव्हा हे जे विरोधक आहेत, तेही कौतुक करत होते. ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे, ती खंडित होता कामा नये. हे खरे आहे की, चुकीच्या बाजूचे कोणीही समर्थन करू नये . जी बाजू चुकीची आहे, ज्यामध्ये अन्याय अत्याचाराचा भाव आहे त्याचे समर्थन देखील करता कामा नये. मात्र एखाद्या पक्षात जर एखादे चांगले असेल तर त्याचे समर्थनही करण्यास मागे पुढे पाहू नये, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

विधान परिषद शिक्षक मतदार संघ पराभवावर काय म्हणाले मुनगंटीवार ?

भाजपचे नेहमीच मंथन चालू असते. हे विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही अशा भूमिकेतून भाजप चालते. आम्ही इतके वर्ष सत्तेच्या बाहेर होतो, मात्र जनतेचा आवाज बुलंद करत होतो. संसदीय आयुधांचा वापर करत होतो. शेवटी आम्हाला जी शिकवणूक आहे ती, सत्तेसाठी काहीपण; असे नाही तर सत्यासाठी काही पण अशी आहे. आम्ही निवडणूक जिंकलो की हरलो याच्यापुरतं आमचं काम चालत नाही. आमचे लक्ष हे देशातील गरिबांच्या आयुष्यातील अंधार बाजूला करण्याचे आहे. चार निवडणुका हरल्या म्हणजे काहीतरी गडबड झाली, असे समजायचे कारण नाही. ठीक आहे आमचा पराभव झाला. आम्ही त्याचे समर्थन नक्की करू आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही उभारी घेऊ, असे मंत्री मुनगंटीवार

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामान्यावरही बोलले, म्हणाले....

काँग्रेसच्या अंतर्गत बाबीमध्ये मी का लक्ष घालू ? मात्र त्या पक्षाचेही एकमेकांचे पाय ओढण्याची परंपरा आहे. भाजपची जवळक असल्याचे वाटत नाही, त्यांच्या पक्षामध्ये ही मोठी परंपरा आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची त्या परंपरेचे जे जे पाईक आहेत ते ते पुढे जातील. त्याच्यासाठी आम्ही काय बोलायची कारण नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

कृषी विज्ञान केंद्राची पाहणी -

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. मुनगंटीवार यांनी कृषी विज्ञान केंद्रासह कृषी महाविद्यालय आणि डेअरी ऑफ  एक्सलन्सची देखील मुनगंटीवार यांनी पाहणी केली. बारामतीमध्ये होणारे कृषी प्रदर्शन हे मुनगंटीार यांना घ्यायचे आहे. म्हणून बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत आले होते. त्यावेळी मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्यावेळी बारामतीतून निघत होते त्यावेळी त्यांना बारामती चांगली आहे का असं प्रश्न विचारला असता चंद्रपूर आमचं चांगला आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

सूर्यप्रकाशावर लाईट निर्मिती केली पाहिजे -
चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रदर्शन भरावयचे आहे. या भागातील टेक्नॉलॉजीचा वापर तिकडे कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. अमेरिकेत भरड धान्याचे उत्पन्न जास्त आहे. पंजाब सरकारने लाईट फुकट दिली होती आणि कालांतरानं त्यांची आर्थव्यवस्था ढासळली. सूर्यप्रकाशावर लाईट निर्मिती केली पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले ?

मंत्रिमंडळ विस्तार झालं नाही म्हणून राज्य थांबले का? निवडणुका झाल्या नाहीत म्हणून काम थांबली का? 20 मंत्र्यांनी अनेक निर्णय घेतला. आजपर्यंत निर्णय झाले नाही ते निर्णय या सरकारने घेतले आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.  सत्ता संघर्षचा निकाल लागेल. मी कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी केली नाही आणि राजकीय पक्षाची शकले होताना मी पाहिले नाहीये. जे नियमानुसार आहे ते होईल अशी आशा आहे, असेही ते म्हणाले. 

अजित पवार आज म्हणत आहेत अधिवेशनाचा कालावधी वाढावा हे मी 2 वर्ष म्हणत होतो, तेच आता अजित पवार म्हणत आहेत. अधिवेशनाचा कालावधी वाढवून जनतेच्या हिताची कामे झाली पाहिजेत. तसं झालं तर 4 आठवडे घेऊ, असे मुनगंटीवार यांनी सांगितलं.  

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात काय म्हणाले?

कुणाच्याही गाडीवर हल्ला होता कामा नये. मग ते किरीट सोमय्या असो किंवा आदित्य ठाकरेंची असो.  किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून रडीचा डाव कुणी केला? गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? हे बघितले पाहिजे.. जेव्हा आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा...  अशा घटनांना राजकीय  स्वरूप देणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Death : गाडी पार्किंग ते दरीत ढकलण्यापर्यंत...18 जूनला लोहगडावर 'त्या' 75 मिनिटांत काय घडलं? केतन कसं संपवलं? मिनिट-टू-मिनिट रिक्रिएशन
गाडी पार्किंग ते दरीत ढकलण्यापर्यंत...18 जूनला लोहगडावर 'त्या' 75 मिनिटांत काय घडलं? केतन कसं संपवलं? मिनिट-टू-मिनिट रिक्रिएशन
Ketan Agrawal Pune Lohagad Case: पोलिसांना सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
Ketan Agrawal Death :
"लगेच लग्न केलं तर संशय येईल..."; केतन अग्रवालला संपवल्यानंतर तब्बल 3 वर्ष थांबण्याचा होता सिया-चेतनचा 'मास्टरप्लॅन'! सगळं ठरलेलं पण...
Pune Crime News: रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; पुण्यात माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; पुण्यात माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Embed widget