एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : आदित्य ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यावर काय म्हणाले मंत्री सुधीर मुनगंटीवार?

Sudhir Mungantiwar : आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Sudhir Mungantiwar : कुणाच्याही गाडीवर हल्ला होता कामा नये. मग ते किरीट सोमय्या असो किंवा आदित्य ठाकरेंची असो.  किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून रडीचा डाव कुणी केला? गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? हे बघितले पाहिजे.. जेव्हा आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा आहे. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा. अशा घटनांना राजकीय  स्वरूप देणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. ते आज बारामतीमधील माळेगाव येथील बोलते होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. 

मोदीजी जेव्हा बारामतीत आले, तेव्हा एखादे उत्तम काम असेल, तर त्याची कौतुक करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. मी सुद्धा एखादे चांगले काम करतो, तेव्हा हे जे विरोधक आहेत, तेही कौतुक करत होते. ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे, ती खंडित होता कामा नये. हे खरे आहे की, चुकीच्या बाजूचे कोणीही समर्थन करू नये . जी बाजू चुकीची आहे, ज्यामध्ये अन्याय अत्याचाराचा भाव आहे त्याचे समर्थन देखील करता कामा नये. मात्र एखाद्या पक्षात जर एखादे चांगले असेल तर त्याचे समर्थनही करण्यास मागे पुढे पाहू नये, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

विधान परिषद शिक्षक मतदार संघ पराभवावर काय म्हणाले मुनगंटीवार ?

भाजपचे नेहमीच मंथन चालू असते. हे विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही अशा भूमिकेतून भाजप चालते. आम्ही इतके वर्ष सत्तेच्या बाहेर होतो, मात्र जनतेचा आवाज बुलंद करत होतो. संसदीय आयुधांचा वापर करत होतो. शेवटी आम्हाला जी शिकवणूक आहे ती, सत्तेसाठी काहीपण; असे नाही तर सत्यासाठी काही पण अशी आहे. आम्ही निवडणूक जिंकलो की हरलो याच्यापुरतं आमचं काम चालत नाही. आमचे लक्ष हे देशातील गरिबांच्या आयुष्यातील अंधार बाजूला करण्याचे आहे. चार निवडणुका हरल्या म्हणजे काहीतरी गडबड झाली, असे समजायचे कारण नाही. ठीक आहे आमचा पराभव झाला. आम्ही त्याचे समर्थन नक्की करू आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही उभारी घेऊ, असे मंत्री मुनगंटीवार

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामान्यावरही बोलले, म्हणाले....

काँग्रेसच्या अंतर्गत बाबीमध्ये मी का लक्ष घालू ? मात्र त्या पक्षाचेही एकमेकांचे पाय ओढण्याची परंपरा आहे. भाजपची जवळक असल्याचे वाटत नाही, त्यांच्या पक्षामध्ये ही मोठी परंपरा आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची त्या परंपरेचे जे जे पाईक आहेत ते ते पुढे जातील. त्याच्यासाठी आम्ही काय बोलायची कारण नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

कृषी विज्ञान केंद्राची पाहणी -

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. मुनगंटीवार यांनी कृषी विज्ञान केंद्रासह कृषी महाविद्यालय आणि डेअरी ऑफ  एक्सलन्सची देखील मुनगंटीवार यांनी पाहणी केली. बारामतीमध्ये होणारे कृषी प्रदर्शन हे मुनगंटीार यांना घ्यायचे आहे. म्हणून बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत आले होते. त्यावेळी मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्यावेळी बारामतीतून निघत होते त्यावेळी त्यांना बारामती चांगली आहे का असं प्रश्न विचारला असता चंद्रपूर आमचं चांगला आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

सूर्यप्रकाशावर लाईट निर्मिती केली पाहिजे -
चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रदर्शन भरावयचे आहे. या भागातील टेक्नॉलॉजीचा वापर तिकडे कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. अमेरिकेत भरड धान्याचे उत्पन्न जास्त आहे. पंजाब सरकारने लाईट फुकट दिली होती आणि कालांतरानं त्यांची आर्थव्यवस्था ढासळली. सूर्यप्रकाशावर लाईट निर्मिती केली पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले ?

मंत्रिमंडळ विस्तार झालं नाही म्हणून राज्य थांबले का? निवडणुका झाल्या नाहीत म्हणून काम थांबली का? 20 मंत्र्यांनी अनेक निर्णय घेतला. आजपर्यंत निर्णय झाले नाही ते निर्णय या सरकारने घेतले आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.  सत्ता संघर्षचा निकाल लागेल. मी कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी केली नाही आणि राजकीय पक्षाची शकले होताना मी पाहिले नाहीये. जे नियमानुसार आहे ते होईल अशी आशा आहे, असेही ते म्हणाले. 

अजित पवार आज म्हणत आहेत अधिवेशनाचा कालावधी वाढावा हे मी 2 वर्ष म्हणत होतो, तेच आता अजित पवार म्हणत आहेत. अधिवेशनाचा कालावधी वाढवून जनतेच्या हिताची कामे झाली पाहिजेत. तसं झालं तर 4 आठवडे घेऊ, असे मुनगंटीवार यांनी सांगितलं.  

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात काय म्हणाले?

कुणाच्याही गाडीवर हल्ला होता कामा नये. मग ते किरीट सोमय्या असो किंवा आदित्य ठाकरेंची असो.  किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून रडीचा डाव कुणी केला? गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? हे बघितले पाहिजे.. जेव्हा आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा...  अशा घटनांना राजकीय  स्वरूप देणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat on Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Pune News: देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget