एक्स्प्लोर

Chandrakant Patil ; राजकारणात एका क्षणात शक्यता बदलते, चंद्रकांत पाटलांची पुन्हा शिवसेनेला साद

भाजप- शिवसेनेमधील (BJP) पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बांधावा, या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा धागा पकडत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी पुन्हा शिवसेनेला साद घातली.

पुणे : दोन भावांनी आपापसातील भांडणं संपवून कधीतरी संबंध निर्माण करावे लागतात. राजकारणात कोणतीही शक्यता एका क्षणात बदलते. भाजप आणि शिवसेनेशी (Shiv sena) युती कधीही शक्य आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. शिवसेना आणि भाजपमधील पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बांधावा, या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा साद घातली आहे. पिंपरी चिंचवडमधील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "राजकारणात कोणतीही शक्यता एका क्षणात निर्माण होते. 2014 मध्ये भाजप- शिवसेना युती झाली नाही. परंतु आम्ही सत्तेत एकत्र आलो. राजीनामे खिशात होते त्यामुळे रोज सरकार पडेल असं वाटायचं. परंतु, प्रत्यक्षात तसं झालं नाही, सरकार पाच वर्षे चाललं. त्यामुळं राजकारणात कधी काही होईल सांगता येत नाही. पण सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे की दोन भावांची भांडणं संपवून पुन्हा एकदा संबंध निर्माण करावेत. पण असं आम्ही म्हटलं की सामनामध्ये अग्रलेख येतो, यांना सत्ता नसल्याने झोप लागत नाही. पण आम्हाला शांत झोप लागते, उलट आम्हाला उठवावं लागतं."
 
"शिवसेनेमधील अस्वस्थता हळूहळू बाहेर पडत आहे. माजी मंत्री तानाजी सावंत, शिवसेना नेते रामदास कदम, अब्दुल सत्तार यांनी मनातील बोलायला सुरूवात केली आहे. काही जण खासगीतही बोलल आहेत. खऱ्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे दाबून ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना हिंदुत्वाकडे जावंच लागेल. त्यातूनच अशी वक्तव्य उघडपणे बोलली जातात" असे म्हणत रामदास कदमांप्रमाणे आशीर्वाद घेणाऱ्यांची खूप मोठी यादी आहे. ही यादी खासगीत सांगतो अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.  

लॉकडाऊनवर कोणाचीच सहमती होणार नाही
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात निर्बंध आणि लॉकडाऊनवर चर्चा होत आहेत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "कडक निर्बंधांना कोणाचा विरोध नाही. परंतु, लॉकडाऊनला कोणाचीच सहमती होणार नाही. गेल्या दोन वर्षात लोकांनी खूप सहन केले आहे. त्यामुळे सगळं सुरू ठेवायचं पण निर्बंध कडक ठेवायचे आणि त्याची अंमलबजावणी करून घ्यायची. जसं  मास्क न घातल्यास 500 रुपये दंड, पाचशेचा पाच हजार दंड करायचा. परंतु असं करून सर्व सामान्यांना मेटाकुटीला आणाल. त्यामुळं कडक निर्बंध लावा, पण हे बंद ते बंद असं करणं योग्य नाही. कोरोना आता संपण्याच्या दिशेला आहे. त्यामुळे त्याचं स्वरूप भयावह नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

धनंजय मुंडेंच्या सेल्फीला समर्थन
कडक निर्बंध सर्वांनीच पाळायला हवेत. परंतु, दुर्बीण घेऊन बसण्याचं काही कारण नाही. शेवटी राजकीय, सामाजिक कार्यकर्त्याला दिवसभरात अनेक ठिकाणी उपस्थिती लावावी लागते. त्याने जर तिथं सेल्फी काढली नाही तर त्यावेळीही टीका होते. हा जास्त शहाणा झाला, सेल्फी पण काढू देत नाही. शेवटी राजकीय नेत्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नेहमी दुर्बीण घेऊन बसण्याचं कारण नाही. पण नियम सर्वांनी पाळायला हवेत. असे छोटे कार्यक्रम करावे लागतील. मोठे कार्यक्रम बंद करावेत असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्क केले. 

सुनील शेळकेंना बक्षीस मिळणार आहे क? 
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर नागरिकांना क्वारंटाईन करणार, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिला होता. सुनील शेळके यांच्या या वक्तव्यावरही चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले,  लोक दुसरा डोस का घेत नाहीत हे समजत नाही? विदेशात दोन डोस घेणाऱ्यांना बक्षीस दिलं जातंय, हे कशासाठी? तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी असायला पाहिजे. पण दुसरीकडे अशी बळजबरी करून चालणार नाही. आता सुनील शेळकेंची पैलवानी स्टाईल आहे, त्यामुळं ते म्हणतात. पण लोकांनी तसं म्हणायची स्थिती निर्माण केली आहे. तीस टक्के लोक डोस घेण्यापासून कसे काय राहतात? सुनील शेळकेंना काय बक्षीस मिळणार आहे का? दीड कोटी लस राज्यात पडून आहेत. त्यामुळे लोकांनी डोस घ्यायला हवेत असे पाटील म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या

 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agarwal Death : केतन अन् सियाचं लग्नासाठी 17 कोटींचा खर्च नव्हता; ना विमानं बुक केली, जयपूरला नाही तर...; सियाच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, खरा खर्चही सांगितला
केतन अन् सियाचं लग्नासाठी 17 कोटींचा खर्च नव्हता; ना विमानं बुक केली, जयपूरला नाही तर...; सियाच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, खरा खर्चही सांगितला
Ketan Agarwal Death Case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; सिया गोयलविरुद्ध ठोस पुरावेच नाहीत? बचाव पक्षाचा मोठा दावा; उज्ज्वल निकम लढवणार खटला, काय आहे बचाव पक्षाचे दावे?
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; सिया गोयलविरुद्ध ठोस पुरावेच नाहीत? बचाव पक्षाचा मोठा दावा; उज्ज्वल निकम लढवणार खटला, काय आहे बचाव पक्षाचे दावे?
Ketan Agrawal Pune Lohagad Case: सख्ख्या भावनेही आता सियाला तोंडावर पाडलं; पोलिसांना दिली केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण देणारी माहिती, 10 तासांच्या चौकशीत काय काय म्हणाला?
सख्ख्या भावनेही आता सियाला तोंडावर पाडलं; पोलिसांना दिली केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण देणारी माहिती, 10 तासांच्या चौकशीत काय काय म्हणाला?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: क्रिकेटचे मैदान, भावाची मैत्री अन् 2004 कॉल्स; सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? मोठी माहिती समोर
क्रिकेटचे मैदान, भावाची मैत्री अन् 2004 कॉल्स; सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? मोठी माहिती समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
TET Paper Leak: मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच, तुमच सुद्धा होईल; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटलांना थेट फटकार
तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच, तुमच सुद्धा होईल; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटलांना थेट फटकार
Embed widget