एक्स्प्लोर

शेतकरी भाजपात आल्यानंतरच कर्जमुक्ती करणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, टनामागे 15 रुपये घेण्यावरुन संताप

पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीटन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 रुपये असे एकूण टनामागे 15 रु. कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट आहे, मी देखील अतिवृष्टीच्या (Rain) ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सरकारला हात जोडून, राजकारण न आणण्याची आणि एकत्र येऊन मार्ग काढण्याची विनंती केली आहे. मात्र, मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात व्यस्त तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नसतात आणि शेतकरी वाऱ्यावर पडला आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. यावेळी, ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवरही नाव न घेता टीका केली. तसेच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या 15 रुपयांवरुनही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तसेच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या 15 रुपयांवरुन संताप व्यक्त केला. साखर सम्राटाप्रमाणे शेतकरीही भाजपात आल्यावरच कर्जमाफी करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीटन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 रुपये असे एकूण टनामागे 15 रु. कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने एकीकडे शेतकऱ्याचाच खिसा कापत दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याचा कार्यक्रम सुरू केल्यावरूनही ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. सध्या साखरसम्राट भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचं कर्ज सरकार भरणार आहे. आता शेतकरी भाजपात आल्यानंतरच त्यांची कर्जमुक्ती करणार का? यासाठीच भाजप मदत करायला थांबली आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तुम्ही साखर सम्राटांसाठी माफी दिली, आम्ही गोरगरीब शेतऱ्यांसाठी मागणी करतोय. ज्या शेतकऱ्यांवर आपली जमीन, मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ आलेली असते. सध्या पीक नष्ट झाल्याने शेतकरी कर्जाच्या बोज्यात दाबून गेले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.

साखर संघानेदेखील ऊस उत्पादकांची कपात करण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. शेतकरी अतिशय उद्विग्न आहेत, आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 50 हजारांची मागणी केली होती, आणि कर्जमाफीही केली पाहिजे. ओला दुष्काळ हा शब्द नसेल तर मदत करणार नाही. माझ्याकडे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं पत्र असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 16 ऑक्टोबर 2020 रोजीचं हे पत्र उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवलं. विरोधी पक्षनेत्याला वेदना होतात मुख्यमंत्र्यांना होत नाहीत, मात्र मला झाल्या म्हणून मी कर्जमुक्ती केली, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असा पत्रात उल्लेख आहे

आवास योजनेतून घरं बांधून द्या (Farmers help by PMAY) 

फालतू शब्दांचा खेळ करू नये, एक फुल आणि दोन हाफ यांचा अभ्यास सुरू आहे. अद्याप केंद्राचं पथक राज्यात आलेलं नाही. मग पाहणी करून पंचनामे करून, निर्दयपणाने सगळं सुरू आहे. ओला दुष्काळ म्हणा की, अकलेचा दुष्काळ म्हणा, मात्र शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. शेतकऱ्यांचे निवारे पाण्यात वाहून गेले आहेत, घरात 48 तास पाणी राहिलं पाहिजे, हा कोणता निकष? पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून दिलीच पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

सरकारने कागदी घोडे नाचवू नये - ठाकरे (Uddhav Thackeray rain flood)

पूरग्रस्त भागातील शाळा तात्काळ सुरू करा, रोगराई पसरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील 80 कोटी लोकांना पंतप्रधान फुकटात अन्न धान्य देतात, पण जो हे सगळं पिकवतो तो आज उघड्यावर आला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या आहेत, रस्ते वाहून गेले आहेत, सरकारने तातडीने लक्ष द्यावे. सरकार काम करत नाही, केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे जावं, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget