एक्स्प्लोर

''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं

मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी,  उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले.

मुंबई  : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर घोषणा झालेल्या राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुकांसाठी Election) आज मतदान पार पडत आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत असून सर्वच मतदारसंघात थेट महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत आहे. मात्र, नाशिक (Nashik) मतदारसंघात अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारामुळे चौरंगी लढत होत आहे. याच विधानपरिषदेच्या मतदानासाठी आज ठाकरे कुटुंबीय मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी, उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर भाष्य करताना, त्यांनी खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिली. त्यामुळे, राज्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असून यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.  

मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी,  उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ''उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे, सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे.उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, उद्या मी सर्व विषयावर बोलेन,'' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांन चहापानांचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, विरोधकांनी अघोषित परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरेंनीही महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.  

शिवसेना आमदारांची बैठक, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री 8 वाजता बांद्रा ताज लँड हॉटेलला बैठक बोलवण्यात आली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्यानं या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनिती असणार यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. लोकांचे कोणते प्रश्न हाती घेवून आवाज उठवायचा याबद्दल उद्धव ठाकरे बैठकीत सर्वच आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.  शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समजते. 

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. राज्यात शतेकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असून सरकार गंभीर नाही. त्यामुळे, अधिवेशनापूर्वी सरकारने दिलेल्या चहापान निमंत्रणावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे सांगण्यात आले. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
PAK vs SA : रबाडानं पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं नंतर दक्षिण आफ्रिकेसमोर पाकच्या टॉप ऑर्डरचं लोटांगण, पराभवाचं सावट
अकराव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या रबाडाचं अर्धशतक, पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं, आता टॉप ऑर्डर फेल
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Maharashtra Cabinet: गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MLA Fund Politics: 'फर्स्ट टाइम' आमदारांवर ५ कोटींची खैरात, Mahayuti तील जुने आमदार नाराज!
Rajkiya Aatishbaji 2025 | Prashant Padole | मोदी फुसका फटाका,राहुल गांधी ॲटमबॉम्ब : खा.प्रशांत पडोळे
Rajkiya Aatishbaji 2025 | Anil Deshmukh | शरद पवार टायगर बॉम्ब, अजितदादा चक्री; देशमुखांची फटाकेबाजी
Rajkiya Aatishbaji 2025 | Sadabhau Khot | राऊत फुलबाजा, ठाकरेंना भुईचक्र; खोतांची राजकीय फटाकेबाजी
MNS vs Govt: 'दुसऱ्यांचे कार्यक्रम आपलेच दाखवण्यापर्यंत सरकार जाईल वाटलं नव्हतं', दीपोत्सवावरून मनसे संतापली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
PAK vs SA : रबाडानं पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं नंतर दक्षिण आफ्रिकेसमोर पाकच्या टॉप ऑर्डरचं लोटांगण, पराभवाचं सावट
अकराव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या रबाडाचं अर्धशतक, पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं, आता टॉप ऑर्डर फेल
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Maharashtra Cabinet: गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
यकृत आजारांपासून मुक्ती! योग-आयुर्वेदाने अनेकांना नवजीवन मिळालं,पतंजलीचा दावा
यकृत आजारांपासून मुक्ती! योग-आयुर्वेदाने अनेकांना नवजीवन मिळालं,पतंजलीचा दावा
स्वत: दूर अन् आता तडकाफडकी तीन उमेदवारांनी सुद्धा पळ काढला! भाजपवर गंभीर आरोप, प्रशांत किशोरांच्या पक्षात नेमकं झालं तरी काय?
स्वत: दूर अन् आता तडकाफडकी तीन उमेदवारांनी सुद्धा पळ काढला! भाजपवर गंभीर आरोप, प्रशांत किशोरांच्या पक्षात नेमकं झालं तरी काय?
ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचला, देशाच्या खेडोपाड्यात टीव्ही पोहोचणारा 'किमयागार' हरपला
ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचला, देशाच्या खेडोपाड्यात टीव्ही पोहोचणारा 'किमयागार' हरपला
Satej Patil on Mahayuti Government: 'शपथ घेतात दुजाभाव न करण्याची, पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला' सतेज पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल
'शपथ घेतात दुजाभाव न करण्याची, पण निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला' सतेज पाटलांचा आमदार निधीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल
Embed widget