एक्स्प्लोर

Sonam Wangchuk on Pradhan Resignation : "तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती

Sonam Wangchuk on Dharmendra Pradhan Resignation : सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून यामागची सर्व कारणे स्पष्ट केली आहेत. तसेच, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारसोबत नेमकी काय चर्चा झाली, याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Sonam Wangchuk on Dharmendra Pradhan Resignation : गेल्या २८ जूनपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. सोनम वांगचुक (Sonam Wangchuk)  यांनी शुक्रवारी उपोषण सोडल्याची माहिती देत सांगितले की, आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे आणि ‘नीट’ (NEET) पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडितांच्या कुटुंबांना भरपाई देणे, या मागण्यांवर सरकारने सहमती दर्शवली आहे. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारने कोणताही तात्काळ शब्द दिलेला नाही.(Dharmendra Pradhan Resignation)

"२६ व्या दिवशी आनंदाची बातमी"; वांगचुक यांनी सांगितला घटनाक्रम

व्हिडिओमध्ये बोलताना वांगचुक (Sonam Wangchuk)  म्हणाले, "२६ व्या दिवशी मी तुम्हाला एक विशेष बातमी सांगू इच्छितो. आता रात्रीचे साधारण १२:३० वाजत आहेत. काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा साहेब आणि जितेंद्र सिंह साहेब येथे आले होते. तसेच लडाखच्या 'ॲपेक्स बॉडी'चे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते."(Sonam Wangchuk) 

ते पुढे म्हणाले, "यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ६५ खासदारांनी येऊन आणि स्वाक्षऱ्या करून मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच, संसदेत 'नीट' पेपर फुटी आणि परीक्षा पद्धतीवर चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सरकारच्या वतीने आलेल्या मंत्र्यांनीही हेच आश्वासन दिले आहे."(Sonam Wangchuk) 

सोनम वांगचुक यांच्या प्रमुख मागण्या आणि सरकारची लेखी सहमती

आपल्या मागण्यांवर भाष्य करताना वांगचुक म्हणाले, "गेल्या दोन दिवसांपासून मला सरकारकडून स्पष्ट आणि लेखी आश्वासन हवे होते. यासाठी दोन दिवस गेले, त्यामुळे मला आणखी दोन दिवस उपोषणाला बसावे लागले. मी आणखी काही दिवस बसलो असतो, पण अखेर आज त्यांनी मला लेखी आश्वासन दिले आहे."

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलीस गुन्हे दाखल करणार नाहीत, यावर सरकार तयार झाले आहे. याशिवाय २० जुलै रोजी झालेल्या मार्चमध्ये सहभागी झालेल्यांवरही कोणतीही कारवाई केली जाणार नाही. संसदेत पेपर फुटी आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारांवर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने आधीच दिले आहे. तसेच, अलीकडेच झालेल्या 'नीट' पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य ती भरपाई देण्याबाबत सरकार विचार करत आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार की नाही?

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना वांगचुक म्हणाले, "आता तुम्ही नक्कीच विचाराल की धर्मेंद्र प्रधान जी यांच्या राजीनाम्याचे काय झाले? पहिली गोष्ट म्हणजे, हे कधी होईल याबाबत ते मला सध्या तरी कोणतेही आश्वासन देऊ शकलेले नाहीत. मात्र, संसदेच्या सभागृहात यावर चर्चा नक्कीच होईल."

ते पुढे म्हणाले, "आता माझ्यासमोर दोनच मार्ग होते. एक तर मी आठवडेन् आठवडे उपोषणाला बसून राहावे आणि कदाचित त्यातच माझा अंत व्हावा. परंतु, तुमच्यापैकीच हजारो लोक गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून मला सांगत आहेत की, 'तुमचा जीव महत्त्वाचा आहे, लढा पुढे नेण्यासाठी तुमचे जिवंत राहणे गरजेचे आहे."

"यात सरकारचेच नुकसान"; वांगचुक यांचा टोला

राजीनाम्याच्या मुद्द्यावर आपले मत मांडताना वांगचुक म्हणाले, "आम्ही हे साध्य केले नाही, असे मी मानत नाही. मित्रांनो, माझे विचार थोडे वेगळे आहेत. जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्याने आपले किंवा मुलांचे नुकसान होणार नाही, उलट सरकारचेच नुकसान होईल. हा छोटासा मुद्दा न सोडवता सरकार स्वतःचेच नुकसान करून घेत आहे."

ते पुढे म्हणाले, "जर त्यांनी राजीनामा दिला असता, तर त्यांचे हे सर्व नुकसान कधीच थांबले असते. त्यामुळे माझ्यासाठी हा मुद्दा सर्वात जास्त महत्त्वाचा नव्हता, याचे निवारण विविध मार्गांनी आपोआप होईल. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे हे होते की, आपल्या मुलांवर कोणतेही खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत."

लडाखच्या परिस्थितीचा केला उल्लेख

आपल्या अनुभवाचा दाखला देत वांगचुक म्हणाले, "मी लडाखमध्ये पाहिले आहे की, एफआयआरच्या (FIR) फेऱ्यांमध्ये अडकून तरुणांचे आयुष्य आणि भविष्य कसे उद्ध्वस्त होते. आता आपल्या मुलांसोबत तसे काहीही होणार नाही, ही गोष्ट आम्ही सरकारकडून साध्य करून घेतली आहे, याचा मला आनंद आहे. तसेच मृत मुलांच्या कुटुंबांना योग्य भरपाई दिली जाईल, याचेही समाधान आहे. देशाच्या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात म्हणजेच संसदेत या मुद्द्यावर आणि जबाबदारीवर पूर्ण चर्चा होईल." शेवटी सर्वांचे आभार मानताना ते म्हणाले, "या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!"

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Rathod : वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
वसंतराव नाईकांच्या वाटेवर चालणं माझं ध्येय, समाजाचं भलं होईल; मंत्री संजय राठोडांचं वक्तव्य
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget