एक्स्प्लोर

शरद पवारांनी त्या दोघांकडून प्रयोग करुन घ्यायला हवा होता;हसन मुश्रीफांचा पलटवार, राहुल गांधींवरही टीका

शरद पवार यांनी केलेल्या 2 अज्ञात व्यक्तींच्या वक्तव्यावरुन गदारोळ माजला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ही सलीम जावेदची गोष्ट चालली आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) यांच्या एका वाक्याने देशाच्या राजकारणात धुमाकूळ घातला आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असून मतदार यादीतीली घोळ व बोगस मतदारावरुन आयोगाला आणि भाजपला लक्ष्य केले. त्यानंतर, निवडणुकांपूर्वी 2 लोकं आपल्याला भेटली होती, 160 जागा मॅनेज करुन देण्याचं ते बोलत होते, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्यावरुन, राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गदारोळ उठला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता महायुतीमधील मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushriff) आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

शरद पवार यांनी केलेल्या 2 अज्ञात व्यक्तींच्या वक्तव्यावरुन गदारोळ माजला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ही सलीम जावेदची गोष्ट चालली आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अशा प्रकारे तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही पोलीस तक्रार का केली नाही? निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही? तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? त्यामुळे मला वाटतं या सलीम-जावेदच्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, असे म्हणत फडणवीसांनी राहुल गांधी अन् शरद पवारांवर टीका केली. तर, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. 

शरद पवार यांना ज्या दोन व्यक्ती भेटून जातात त्यांचं नाव गाव पत्ता त्यांना माहीत असेल. ते ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्याचं मला आश्चर्य वाटतं, त्याचवेळी त्यांच्याकडून शरद पवार साहेबांनी प्रयोग करून घ्यायला हवा होता, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच, असं काही झालेलं नाही, शरद पवार साहेब गुगली टाकत आहेत, कथो कल्पित गोष्टी सांगून लोकांची फक्त मनोरंजन होईल, असेही मुश्रीफ यांनी म्हटले. 

बिहार निवडणुकांसाठी राहुल गांधींचा स्टंट

अनेक दिवसांपासून मत चोरी झालेली आहे, ती निवडणूक आयोगाने केली आहे, अशी तक्रार राहुल गांधी करत आहेत.  गांधी यांनी शपथपत्र देऊनही तक्रार करण्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, पराभव हा पराभव असतो, तो पचवण्यासाठी ताकद लागते. ज्यावेळी कच्च्या याद्या येतात, त्यावेळी लोक हरकती घेत असतात, कोल्हापुरातून एकही तक्रार आली नाही याचे हे उदाहरण आहे. राहुल गांधी विनाकारण देशाचा, संसदेचा आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत, त्यातून सिद्ध काही होणार नाही हा बिहार निवडणुकीसाठी राहुल गांधींचा स्टंट आहे, असेही हसन मुश्रीफ यांनी म्हटले.  

राष्ट्रपतींकडे तक्रार केली पाहिजे - सामंत

शरद पवारांना अज्ञात लोक भेटली होती, त्यांची नावं त्यांना माहिती नाहीत. अस असेल तर त्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली पाहिजे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. 

शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे वरातीमागून घोडं - प्रक्राश आंबेडकर

शरद पवार यांचा 160 जागा संदर्भांतला दावा म्हणजे वराती पाठीमागून घोडं असं आहे. आम्ही यापूर्वी या सगळ्या पक्षांना म्हणालो होतो की आपण सगळेजण मिळून कोर्टात जाऊ. त्यावेळी कोणीही आमच्या सोबत आलं नाही. कोर्ट एकमेव व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं. त्यावेळी त्यांनी ते केलं नाही. आता बोंबलत बसता, अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा

योगेश कदमांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यावर उधळले पैसे, बनियन-लुंगी घालून आंदोलन; महायुतीच्या 'कलंकित' मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचा एल्गार

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget