एक्स्प्लोर

Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar: बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती.

Sharad Pawar: मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती देताना आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर, विरोधकांकडून एन्काऊंटरच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) राजीनाम्याची मागणी करत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या घटनेवर अनेस प्रश्न उपस्थित करत कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्र्यांना ताबडतोब पदावरुन हटवलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही सवाल उपस्थित केले आहेत.   

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावरुन राजकीय प्रतिक्रिया येत असून या खटल्यातील सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर लगेच सुरू झालेले आरोप प्रत्यारोप दुर्दैवी आहे. या प्रकरणातल्या सर्व बाबींवर पोलीस तपासानंतर अधिक तथ्य समोर येणार असल्याचं उज्वल निकम यांनी म्हटलं. तसेच, याप्रकरणी न्यायालयीन चौकशी होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

''बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.'', असे शरद पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. 

पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश कोणी दिले?

आरोपीला न्यायालयाच्या दारात नेऊन त्याचा एन्काऊंटर घडवून आणणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे, अशा शब्दात या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती घेऊन त्या अनुषंगाने गुन्हेगारांना शिक्षा व पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून न्यायपालिका भूमिका बजावत असते. पण याउलट युपी-बिहारची एन्काऊंटर संस्कृती महाराष्ट्रात आणण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. कायदा गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीच आहे, पण कायद्याचा गैरवापर जेव्हा केला जातो तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. कुणी म्हणतंय की अक्षयने आत्महत्येचा प्रयत्न केला, कुणी म्हणतंय की पोलिसांनी एन्काऊंटर केलं... आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस काय करत होते? पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश कुणी दिले? गोळ्या कुठे लागल्या? हे प्रकरण संशयास्पद असून याची न्यायिक चौकशी व्हायलाच हवी. पण त्यासोबतच, महत्त्वाचं म्हणजे, निवडणुका तोंडावर असताना अशा हिंसक व न्यायविरोधी घटना घडवून आणून लोकांच्या भावनांशी खेळणं हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात नक्की काय लपवलं जातंय, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय?, असे सवाल यांनी आव्हाड यांनी विचारले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

"बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याच्या तपासासाठी आणत असताना त्याने पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर फायरिंग केली. त्यात एपीआय निलेश मोरे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ बचावासाठी गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आता पोलिस तपासात वस्तुस्थिती डिटेलमध्ये समजून येईल", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच, ज्यावेळी या लहान मुलीवर अन्याय झाला, त्यावेळी विरोधक सांगत होते याला फाशी द्या, आता तिचं विरोधक आरोपीची बाजू घेत आहे. ज्याने माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य केले, अश्या आरोपीची बाजू घेणे म्हणजे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा, असे म्हणत विरोधकांच्या टीकेवर पलटवार केला. 

हेही वाचा

 पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार

व्हिडीओ

Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Parbhani : जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजप धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
Pune BJP : पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
Embed widget