एक्स्प्लोर

Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार

Sharad Pawar : शरद पवार यांनी अमित शाह यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा असल्याचं म्हटलं याशिवाय ते काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, असंही ते म्हणाले.

कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही शिवसेनेचे मेळावे, अमित शाह यांच्याकडून होणारी टीका, आगामी निवडणुका, उदय सामंत यांचे आमदार फुटण्याचे दावे, दावोसमधील गुंतवणूक याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  अमित शाह आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे असं शरद पवार म्हणाले. 

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्यासाठी दोघांनी कार्यक्रम घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असं दोघांनाही वाटतं आणि त्याची प्रचिती आपण पाहिली. पण लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक होती, असं निरिक्षणावरुन दिसतं, असं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी याच्या अगोदर मतं मांडलं होतं. दोन दिवसांपूर्वी ते माझ्याकडे आले होते, सविस्तर चर्चा झाली. काल त्यांनी जे काय सांगितलं तसं त्यांचं मत आहे, मात्र त्यासाठी टोकाची भूमिका घेतली जाईल, असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.

अमित शाह यांच्यावर टीका आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ठाकरेंनी मौन बाळगलं असं पाहायला मिळालं असं विचारलं असता शरद पवार यांनी तसं वाटत नसल्याचं म्हटलं. अमित शाह सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेतृत्त्वानं घेतलेली आहे. अमित शाह आणि त्यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री अधिक तारतम्य ठेवून भाष्य करेल, अशी अपेक्षा असते. त्याची प्रचिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत. अमित शाह हे कोल्हापूरला शिकले की कुठं शिकले मला माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले. 

उदय सामंतांचं स्टेटमेंट दावोसमधील पाहिलं, भांडवली गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेले होते की लोक  फोडायला गेले होते ते माहिती नाही. दावोसमधून त्यांनी जी काही विधान केली ती मुख्यमंत्र्यांचा दावोसचा उद्देश होता त्याच्या सुसंगत नव्हती. ते सांगत असतील तर पाहूया, असं शरद पवार यांनी म्हटलं.  

मी काही फोटो पाहिले, ते लोक ठाकरेंची सेना सोडतील असं वाटत नाही. काही माणसं अशी आहेत की  ते पक्ष आणि बाळासाहेबांची विचारधारा अजिबात सोडणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.  


दावोसला मी देखील मुख्यमंत्री म्हणून गेलो होतो. काल जे करार झाले त्यात भारत फोर्जशी करार झाला, पुणे, कराडला त्यांचे कारखाने आहेत. जिंदाल हे स्टीलच्या फॅक्टरीत महाराष्ट्रात रत्नागिरी,नाशिक जिल्ह्यात आहेत. दावोसमधून हे जाहीर केलं, याचा अर्थ आहे ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवलंय त्या सगळ्यांना तिथून महाराष्ट्रात आणला असा देखावा केल्याचं दिसतं. आपण या हॉटेलमध्ये बसलेत, त्यांचे बंधू यांनी दावोसला करार केला हे माझ्या वाचनात आलंय, असं शरद पवार म्हणाले. फसवणूक असं नाही, नवीन उद्योग करत असतील तर हरकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.

इतर बातम्या :

Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
Embed widget