![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'हर हर महादेव'ला राज ठाकरेंचा आवाज, पहिल्यांदा व्हॉईस ओव्हर कधी केला? जाणून घ्या
Raj Thackeray Interview: 'हर हर महादेव' चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली.
!['हर हर महादेव'ला राज ठाकरेंचा आवाज, पहिल्यांदा व्हॉईस ओव्हर कधी केला? जाणून घ्या Raj Thackeray's voice for 'Har Har Mahadev', when was the first voice over done? find out 'हर हर महादेव'ला राज ठाकरेंचा आवाज, पहिल्यांदा व्हॉईस ओव्हर कधी केला? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/bd825320f8728042860e2289488cbeae_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raj Thackeray Interview: 'हर हर महादेव' चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आपलं चित्रपट प्रेम आणि इतर अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.
माझं नाव स्वरराज.. माझ्या वडिलांना खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून, त्यांना अपेक्षा होती, की मी संगीतात काहीतरी करेल. त्यांनी खूप प्रयत्न केले. अनेक वाद्य वाजून घ्यायचे. पण मी जेव्हा व्यंगचित्र काढायला लागलो, तेव्हा मी स्वरराज नावाने मी चित्र काढत होतो. एकेदिवशी बाळासाहेबांनी सांगितलं की, मी बाळा ठाकरे नावाने सुरुवात केली. तू राज ठाकरे नावाने सुरुवात करायची. त्यानंतर माझं हे दुसरं बारसं कॉलजमध्ये असताना झालं.
मी पहिल्यांदा 2003 मध्ये व्हॉईस ओव्हर केलं. जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांची मुलखात रायगडावर घेण्यात आली होती. त्यावेळी अचानक माझ्यावर ती जबाबदारी आली. व्हॉईस ओव्हर करणं हे माझं काम नाही. 2003 मध्ये त्या मुलाखतीत मी केलं. मात्र त्याला काही अर्थ नव्हता. पहिल्यांदा करत असताना मी वाचल्यासारखं केलं. मात्र 2004 ला मी शिवसेनेचा प्रचार केला होता. त्यात आम्ही नऊ फिल्म केल्या. त्या संपूर्ण नऊ फिल्मचा आवाज अजित भुरे यांचा होता. या सर्व अॅड फिल्म होत्या. त्यातली एक फिल्म मुंबईच्या बॉम्ब ब्लास्टची फिल्म होती. जी निवडणूक आयोगाने रद्द केली. त्या शॉर्ट फिल्मला सुरुवातीच्या एका सीनमध्ये बस जाते, त्यात मी बोललो 'मुंबई', बाकी सर्व आवाज हा अजित भुरे यांचा होता. फिल्म झाल्या. नंतर आम्ही त्या बाळासाहेबांना दाखवल्या, तेव्हा मी आणि अजित भुरे होतो. त्यावेळी त्यांनी अजितला विचारलं मुंबई कोण बोललं. अजित भुरे म्हणाले राज बोलला आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मला वाटलंच.''
मुलगा असल्याने आणि त्यात ठाकरे असल्याने त्याला लढाया सांगाव्या लागतील, असं मला वाटतं नाही. मोठा झाला की त्याला सांगेन इतर कोष्ठीही. मला असं वाटतं, शिवाजी महाराजांना जिजामातांनी रामायण आणि महाभारतातील कथा ऐकवल्या. तो जो संस्कार, तोच संस्कार पुढे सुरू ठेवायला हवा, असं मला वाटतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)