एक्स्प्लोर

'हे आरोप उद्धव ठाकरे, नाना पटोलेंकडे करायला हवे होते', विधान परिषदेतील विजयी आमदार प्रज्ञा सातवांनी फेटाळले अष्टीकरांचे आरोप

Nanded News: आमदार प्रज्ञा सातव यांनी नांदेड विमानतळावर काँग्रेस पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

Pradnya Satav: विधान परिषदेवर नुकतीच निवड झालेल्या आमदार प्रज्ञा सातव यांनी नांदेड विमानतळावर काँग्रेस पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 

यावेळी विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांसह पक्षातील अनेकांनी नव्याने आमदार झालेल्या प्रज्ञा सातव यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती.

प्रज्ञा सातवांनी फेटाळले अष्टीकरांचा आरोप

विधान परिषदेवर नुकतीच निवड झालेल्या आमदार प्रज्ञा सातव यांनी विमानतळावरच हिंगोली चे खासदार नागेश पाटील अष्टेकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. लोकसभेमध्ये मी किती काम केले आहे हे उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ही माहित आहे. नाना पटोले किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करायला हवी होती असं म्हणत नागेश पाटील आष्टीकर यांना रिमोट म्हणून ऑपरेट करत असल्याचा आरोप प्रज्ञा सातव यांनी केला.

काय केले होते अष्टीकरांनी आरोप?

 हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी करत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचे काम केले नाही असा आरोप अष्टीकर यांनी केला होता. नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप प्रज्ञा सातव यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच विमानतळावर भेटण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. दरम्यान, आष्टीकरांच्या आरोपांवर विमानतळावरच त्यांनी हे भाष्य केले.

काँग्रेसची बळकटी वाढणार

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत (Vidhan Parishad election) आमदार प्रज्ञाताई सातव (Pradnyatai Satav) यांच्या विजयानं हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचं पारडं जड झालं आहे.  विधनसभेच्या आमदारांमधून विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रज्ञाताई काँग्रेसच्या एकमेव आमदार ठरल्या असून काँग्रेसचे जिल्ह्यातील बळकटी वाढणार आहे.

हिंगोलीत  शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षांचे आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आता प्रज्ञाताईसातव यांच्या विजयाने काँग्रेसला जिल्ह्यात प्रतिनिधित्व मिळाले असून हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढता आहे. त्यातच हिंगोलीत काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संघटन वाढीला वाव मिळणार आहे.

हेही वाचा:

हिंगोलीत काँग्रेसचं पारडं जड! विधानपरिषद निवडणूकीत आमदार प्रज्ञाताईंच्या विजयाने काँग्रेसला प्रतिनिधित्व

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget