एक्स्प्लोर

आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य

राज्यात फेब्रुवारी 2022 मधे जिल्हा परिषद निवडणुका होण गरजेचं होतं. मात्र, 3 वर्षे निवडणुका झाल्या नाहीत, आता अनेक निवडणुका होणार आहेत

मुंबई : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत असून तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचा मुंबईत मेळाव संपन्न होत आहे. या मेळाव्यातील भाषणात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. त्यामध्ये, निवडणुकांमधील विजय, सध्या आमदारांना दिलेल्या मंत्रिपदाचा कालावधी आणि इतरही बाबींवर भाष्य केलं. राज्य सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी काल मुंबईला होणार होता, म्हणून आज मेळावा घेतला. मात्र, आज नागपुरला शपथविधी होत आहे. तरी देखील आपला मेळावा इथं होत आहे, असे म्हणत अजित पवारांनी (Ajit pawar) मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं.  तसेच, पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यात फेब्रुवारी 2022 मधे जिल्हा परिषद निवडणुका होण गरजेचं होतं. मात्र, 3 वर्षे निवडणुका झाल्या नाहीत, आता अनेक निवडणुका होणार आहेत, असे म्हणत अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य केलं. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचा कालावधी देखील त्यांनी सांगितला.  

2 महिन्यातच महामंडळांचेही वाटप

मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे. त्यानंतर, 2 महिन्यातच महामंडळ निवडी पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही. कहीजणांना मागच्या वेळी दीड वर्षांची टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे, आता 5 वर्षात मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षे टर्म देण्यात येणार आहे. आमचं देखील त्यावर एकमत झालं आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, अशी घोषणाच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून केली. 

मी स्वभाव बदलला, परिणाम दिसला

लोकसभेला मी तटकरे साहेबांना म्हणायचो तटकरे साहेब तुम्ही तरी तुमची लोकसभेची जागा काढा. जर अली नसती तर भोपळा मिळाला असता. तटकरे साहेब मला म्हणून शकत नव्हते तुमची जागा काढा म्हणून. मात्र, त्यांनी जागा काढली, आम्ही मात्र त्यानंतर खूप बदल केले. मी माझा स्वभाव बदलला. जबाबदारी आली की माणूस बदलतो. मी ठरवला आता कुणावर चिडायचं नाही. मी स्वभाव बदलला त्याचा परिणाम दिसला, अशी मिश्कील टीपण्णी देखील अजित पवारांनी मेळाव्यातून केली. दरम्यान, लवकरच पक्षाचे शिबिर होणार आहे. आपल्याकडून गैरसमज होतील अशी वक्तव्ये करू नये. जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 

विजयावर मिश्कील टिपण्णी

सत्कार सोहळ्यात गेल की मोठा हार किंवा ट्रॉफी दिली की समजायच यान काहीतरी वंगाळ काम केलेलं आहे. त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. सुनिल शेळके सांगत होते माझं काही खरं नाही. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांना त्याने झोपू दिलं नाही. त्यांच्या ठिकाणचा प्रकार आणि त्याची तक्रार केंद्रात गेली होती. इंद्रनील नाईकच्या विरोधात ययाती नाईक त्याचा भाऊ उभा होता. मात्र, तो देखील निवडून आला. राजू कारेमोरे 65 हजार मतांनी निवडून आले. काय कळायला नाही काय झालं ते, अशी फटकेबाजी अजित पवार यांनी मेळाव्यातून केली. 

विदर्भातील राजकीय परिस्थितीवर भाष्य

आपण विदर्भात 7 जागा लढलो. मोर्शीतील जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली. जर तसं झालं नसतं तर देवेंद्र भुयार निवडून आले असते. बुलढाणा जिल्हाध्यक्ष काजी यांचं अभिनंदन करतो. बुलढाणा बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी 300 कोटी रुपये देण्याची व्यवस्था त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी केल, मात्र त्या ठिकाणी असलेली व्यक्ती आपलाल्या सोडून गेले. आम्ही काजी यांना विचारलं त्यांनी मनोज कायंदे यांचं नाव सांगितल. त्यांनी सांगितल होतं जर तो निवडून आला नाही तर आम्ही तोंड दाखवणार नाही. आम्ही काजी साहेब यांच्या पाठीशी उभ राहिलो आणि कायंदे यांना संधी दिली आणि तो निवडून आला, असे म्हणत अजित पवारांनी बुलढाण्यातील राजकीय घटनेवर भाष्य केलं.

हेही वाचा

या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Governor: राज्यपालांच्या इच्छेनुसार सरकार चालवू शकत नाही, विधेयकाची मंजुरी अनिश्चित काळासाठी रोखण्याचा अधिकार नाही; अधिकारांवर कोर्टाची 'सर्वोच्च' टिप्पणी
राज्यपालांच्या इच्छेनुसार सरकार चालवू शकत नाही, विधेयकाची मंजुरी अनिश्चित काळासाठी रोखण्याचा अधिकार नाही; अधिकारांवर कोर्टाची 'सर्वोच्च' टिप्पणी
Ajit Pawar: कार्यकर्त्याने प्लॅस्टिकची पिशवी जमिनीवर फेकताच अजित पवारांनी खरडपट्टी काढली, म्हणाले, 'काय रे तुम्ही, वेड्याचा बाजार...'
तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे, येडेच आहेत घाण करतात; अजित पवारांनी सर्वांदेखत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला सुनावलं
Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
BEST Election Result: बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Governor: राज्यपालांच्या इच्छेनुसार सरकार चालवू शकत नाही, विधेयकाची मंजुरी अनिश्चित काळासाठी रोखण्याचा अधिकार नाही; अधिकारांवर कोर्टाची 'सर्वोच्च' टिप्पणी
राज्यपालांच्या इच्छेनुसार सरकार चालवू शकत नाही, विधेयकाची मंजुरी अनिश्चित काळासाठी रोखण्याचा अधिकार नाही; अधिकारांवर कोर्टाची 'सर्वोच्च' टिप्पणी
Ajit Pawar: कार्यकर्त्याने प्लॅस्टिकची पिशवी जमिनीवर फेकताच अजित पवारांनी खरडपट्टी काढली, म्हणाले, 'काय रे तुम्ही, वेड्याचा बाजार...'
तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे, येडेच आहेत घाण करतात; अजित पवारांनी सर्वांदेखत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला सुनावलं
Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
BEST Election Result: बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का
Sumeet Raghavan On Poor Road Conditions: 'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
Maharashtra Heavy Rain: मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
BEST Election Result: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले...
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
Embed widget