एक्स्प्लोर

Marathi Family Attack: मराठी कुटुंबाला मारहाण, राज ठाकरेंच्या मनसेचा फायरब्रँड नेता म्हणाला, 'आता यांचा माज उतरवण्याची वेळ आलेय'

Marathi family beaten: कल्याणमधील देशमुख कुटुंबीयांना मंत्रालयातील अधिकारी अखिलेश शुक्ला याने रॉडने मारहाण केली होती. मराठी माणसांचा अपमान.

मुंबई: कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना फटकारले आहे. मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. कल्याणमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी मूळात ही घटना माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातली आहे. या घटनेनंतर त्यांनी एक चक्कार शब्दही काढलेला नाही. एरवी मराठी माणसासाठी गळे काढतात, अशी टीका अविनाश अभ्यंकर यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ अखिलेश शुक्लाला अटक करावी. त्यांच्या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. अन्यथा मनसेस्टाईलने रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल. मनसेने मराठी माणसासाठी काय केलंय रस्त्यावर उतरून हे भूतकाळात पाहिलं आहे. वर्तमान काळातही मनसेची भूमिका तिच राहिल. मंत्रालयात बसून हा हे धंदे करत असेल तर चालणार नाही. मुंबई काय खायचं कुठे रहायचं हे मराठी माणसाला शिकवू नये. मुंबईत पहिलं मराठी माणसाचचं ऐकलं जाईल नंतर इतरांचं आणि हो मराठी माणसासाठी शिवतीर्थची दार ही सदैव उघडी आहेत. मराठी माणसावर अन्याय झाला तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा गार्भित इशारा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिला आहे.

मराठी कुटुंबाला मारहाण, राज ठाकरेंच्या मनसेचा फायरब्रँड नेता म्हणाला, 'आता यांचा माज उतरवण्याची वेळ आलेय' 

राज्यात सतत मराठी माणसावर हल्ले होतात. या सगळ्यांना निवडणुकीनंतर माज आलाय, यांचा माज उतरवण्याची गरज आहे. जरी मराठी माणूस निवडणुकीमध्ये मराठी माणसाच्या सोबत नसला तरी या मराठी माणसासोबत मनसे असणार. यापुढे अशी कुठली घटना घडली तर मनसे त्याला उत्तर देईल, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.

सरकारने  या घटनेमध्ये हस्तक्षेप करायला हवा. नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चालल्या आहेत. हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही. या घटना जर थांबला नाहीत तर मनसेच्या रागाला सामोरे जावे लागेल. अधिवेशन चालू आहे यात काही मराठी आमदार असतील कारण अनेक जण भय्ये परप्रांतीय झाले आहेत. मराठी आमदार असतील तर त्यांनी हा विषय उचलायला हवा.

अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर आम्ही कायदा हातात घेतला तर काय चुकते? मराठी माणसासोबत अशी घटना घडत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देणार. तुम्ही आम्हाला झाडू मारायला ठेवणार असाल, तर राज ठाकरेंनी सर्व परप्रांतीयांवर झाडू फेरले तर काय चुकते. मनसे अथवा आमचे पदाधिकारी सोडल्यास कोणीही पुढे यायला घाबरते कारण व्होट बँक तुटते. योग्य तो निर्णय घ्यावा नाहीतर मनसैनिकांनी कायदा हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा काय अर्थ आहे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.. मराठी माणसावर जर गुन्हा दाखल होणार असेल तर मराठी माणसाचा सरकार आहे का महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे का असा प्रश्न आमच्यासमोर येईल, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोदी-शाह-फडणवीसांना मुंबई व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायची आहे, मराठी माणसांची ताकद नष्ट करण्याचे प्रयत्न: संजय राऊत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget