Maratha reservation : मनोज जरांगेंना सरकारचा ड्राफ्ट आधीच माहिती होता; RSSच्या अजेंडाप्रमाणे मराठा समाजाला वेगळं पाडलं, मराठा समन्वयकाचा गंभीर आरोप
Maratha reservation : मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की हा रथ मी एकटाच ओढतोय, अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जालना : मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की हा रथ मी एकटाच ओढतोय," अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले, "मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात. ते समस्त मराठा समाजाचे नव्हे तर कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. जरांगेंची एकही मागणी वैद्य, कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही. त्यांना कायदा आणि शासन आदेश यातला फरकच कळत नाही. समाजाने जरांगेवर केवळ फुलांवर 100 कोटी उधळले, पण चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून मराठा समाजाचे नुकसानच होत आहे."
ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता
आरोप करताना लाखे पाटील पुढे म्हणाले, "मनोज जरांगे आंदोलनातून स्वतःची बुवाबाजी चालवतात. त्यांना स्वतः पुढून कॅमेरा जायला नको असं वाटतं. मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना टार्गेट करण्याचं काम ते सूत्रबद्ध पद्धतीने करतात. मुंबईतील आंदोलनादरम्यान शासनाने दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता. केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी गुलाल उधळला गेला. आधीच सरकारसोबत ड्राफ्ट तयार करतात आणि मग अभ्यासकांना बोलावून चर्चा करण्याचे नाटक करून समाजाची फसवणूक करतात", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम
आरएसएस अजेंड्याचा उल्लेख करत ते म्हणाले, "जरांगेंचं आंदोलन उभं राहिलं नाही तर त्यांना सपोर्ट मिळणार नाही. अन्यथा देवेंद्र फडणवीस तीन महिने देखील मुख्यमंत्री राहू शकत नाहीत. RSS च्या अजेंड्यानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम करत आहेत. मराठा समाजाची राधाकृष्ण विखे पाटलांनी बेईमानी केली. यशवंत जरा नीट ही मागणी घटनात्मक, कायदेशीर किंवा वैद्य नसल्याचेही स्पष्ट आहे."
शासनाने दिलेल्या ड्राफ्ट अगोदरच माहीत होता
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या जीआर वरून राज्यातील मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे यांना धारेवर धरलंय, मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉ.संजय लाखे पाटील यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केलीय, मनोज जरांगे हे आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची बुवाबाजी चालवत असून मुंबई आंदोलन दरम्यान मनोज जरांगे यांना शासनाने दिलेल्या ड्राफ्ट अगोदरच माहीत होता केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी त्यांनी गुलाल उधळला असल्याचा आरोप लाखे पाटील यांनी केलाय, मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना सूत्रबद्ध पद्धतीने मनोज जरांगे टार्गेट करत असून , मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा आरएसएसचा अजेंडा ते राबवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
























