एक्स्प्लोर

Aaditya Thackeray: आशिष शेलारांना भाजपमध्ये कोणीही विचारत नाही, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते: आदित्य ठाकरे

Majha Maharashtra Majha Vision : आदित्य ठाकरे यांनी 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेनेतून फुटून गेलेले गद्दार हे भाजपचेही होणार नाहीत. सामान्य शिवसैनिक आमच्या पाठिशी आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

मुंबई: भाजपशी दगाफटका करणाऱ्या पक्षांना दंडित करा, असा आदेश अमित शाह यांनी दिला होता. त्यानुसार आमच्याशी दगाबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आम्ही दंडित केले, असे वक्तव्य करणारे भाजप नेते आशिष शेलार यांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले. मला आशिष शेलारांच्या (Ashish Shelar) कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. कारण मला मनापासून त्यांच्याविषयी वाईट वाटते. मी त्यांना सांगितलं की, त्यांना थेरपीची गरज आहे. आशिष शेलारांना पक्षात कोणी भाव देत नाही. त्यांना मंत्रिपद दिलं जात नाही, त्यांचे जॅकेट तयार आहे. त्यामुळे मला आशिष शेलार यांच्याविषयी सहानुभूतीपलीकडे काहीही वाटत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत एबीपी माझा आयोजित 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते.

प्रदुषणकारी उद्योग महाराष्ट्राला, रोजगारनिर्मिती करणारे उद्योग गुजरातच्या वाट्याला: आदित्य ठाकरे

यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या उद्योगविषयक धोरणांवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना असूनही महाराष्ट्रात मोठी परकीय गुंतवणूक आली होती. पण भाजपने महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाची राखरांगोळी केली आहे. जे उद्योग आपल्याला नको आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणे अवघड आहे, ते प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारले जात आहेत. यामध्ये जैतापूर आणि नाणारसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. तर सेमीकंडक्टर, एअरबस, बल्क ड्रग प्रकल्प यासारखे स्वच्छ आणि मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण करणारे उद्योग गुजरातला पाठवले जात आहेत. महाराष्ट्र कसा चालवायचा, हे दिल्लीतून आलेल्या आदेशांवर ठरत आहे. इगो इश्यू म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला पाठवले जात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

ज्या व्यक्तीने स्वत:ला विकलं तो उद्या भाजपचाही होणार नाही: आदित्य ठाकरे

या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असताना हे सगळं षडयंत्र रचण्यात आले. ज्या व्यक्तीने स्वत:ला विकलं ते उद्या भाजपचेही होणार नाही, हेच लोक उद्या भाजपच्या लोकांची पदं मिळवायच्या मागे लागतील. पण आम्ही या गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी बघून देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'ला राजकीय नेत्यांची मांदियाळी

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधण्यात आला. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.  

आणखी वाचा

राष्ट्रवादीचा मु्ख्यमंत्री म्हणून अजित पवार नाहीतर 'या' नेत्यांना संधी मिळाली असती; प्रफुल पटेलांनी काय म्हटले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget