एक्स्प्लोर

Maharashtra Politics: राज्यसभेबाबत राष्ट्रवादीत खलबतं; कोणाची लागणार वर्णी?

Maharashtra Politics: छगन भुजबळ कुटुंबाकडून राज्यसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक समाजातील चेहरा राज्यसभेवर जावा, अशी देखील एका गटाची मागणी आहे. 

NCP Rajya Sabha Seats : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षामध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागेबाबत अजूनही निश्चिती झाली नसल्याची बाब समोर आली आहे. सध्या पक्षामध्ये वरिष्ठांकडून वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू आहे. राष्ट्रवादीत सध्या एक गट असा आहे, ज्याचं असं म्हणणं आहे की, ओबीसी समाजाला (OBC Samaj) राज्यसभेसाठी संधी मिळायला हवी. यामध्ये भुजबळ कुटुंबाला राज्यसभेची (Rajya Sabha Election) संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, भुजबळ (Chhagan Bhujbal) कुटुंबाकडून राज्यसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक समाजातील चेहरा राज्यसभेवर जावा, अशी देखील एका गटाची मागणी आहे. 

नुकतेच बाबा सिद्धकी (Baba Siddique) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आले आहेत. तर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटून आपली राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना ठाणे जिल्ह्यातील शिष्टमंडळ भेटून गेलं असून आनंद परांजपे यांना राज्यसभेवर पाठवावं, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्या वतीनं गोविंदराव अधिक यांचे चिरंजीव अविनाश अधिक यांच्यासाठी प्रयत्न होत आहेत. 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावं का? यावर देखील पक्षामध्ये खलबतं सुरू आहेत. जर सुनील तटकरे राज्यसभेवर गेले तर पक्षासाठी त्यांना जास्त वेळ देता येईल, असाही एक प्रवाह पक्षामध्ये आहे. परंतु, कर्जत येथील शिबिरात अजित पवार यांनी महायुतीमधील चार जागांवर क्लेम केला होता. यामध्ये रायगडच्या जागेचा देखील समावेश होता. जर सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठवलं, तर रायगड लोकसभेवरील क्लेम राष्ट्रवादीनं सोडला की काय? अशी चर्चा होऊ शकते. त्यामुळे महायुतीत या जागेबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो? याकडे राष्ट्रवादी लक्ष ठेवून आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राज्यसभेसाठी कोणाला संधी देण्यात यावी, याबाबत अद्याप निर्णय झाला नसून हा निर्णय पुढील दोन दिवसात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे. 

राज्यसभेसाठी महायुतीतही चढाओढ 

राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच, आता सर्वच पक्षाच्या हालचाली देखील वाढू लागल्या आहेत. महायुतीनं तशी तयारी देखील सुरू केली असून, पाच जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचा निर्धार महायुतीनं केला आहे. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आणि सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात सहा जागा रिक्त होत असून, भाजप (BJP), शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. भाजपनं तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असून, यामध्ये आघाडीवर विनोद तावडे यांचं नाव असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं भाजपच्या गोटातून समजतंय. 

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची संख्या :

भाजप : 104
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 42 
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40
काँग्रेस : 45
शिवसेना उद्धव ठाकरे गट : 16 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 11
बहुजन विकास आघाडी : 3 
समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1 आणि अपक्ष 13

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
Kagal Nagar Palika Election: कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
Maharashtra Temperature Today: दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News: ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
Kagal Nagar Palika Election: कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
Maharashtra Temperature Today: दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से...  बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतराचा दावा, पण पोलिस तपासात आली भलतीच माहिती समोर! सोशल मीडियात व्हिडिओ तुफान व्हायरल
अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतराचा दावा, पण पोलिस तपासात आली भलतीच माहिती समोर! सोशल मीडियात व्हिडिओ तुफान व्हायरल
Kagal Politics: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Video: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Prajakta Patil : उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
Embed widget