एक्स्प्लोर

उमेदवाराचा पराभव झाला, निकालाबद्दल काही शंका असल्यास EVM मायक्रोचीप तपासता येणार

Lok Sabha Election : दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवाराला जर काही शंका असल्यास ईव्हीएम मायक्रोचीप तपासता येणार आहे. 

मुंबई : देशाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच पराभूत झालेल्या उमेदवारांना काही शंका असल्यास ईव्हीएम मशिनमधील मायक्रोचीप तपासण्याचे अधिकार मिळाले आहे. निकालामध्ये काही शंका असल्यास संबंधित मतदारसंघातील एकूण पाच टक्के ईव्हीएमच्या मायक्रोचीप तपासता येणार आहेत. पण त्यासाठी प्रत्येक ईव्हीएममध्ये 40 हजार रुपये भरावे लागणा. निवडणूक आयोगाच्या इंजिनियरसमोरच ही मायक्रोचीप तपासली जाईल.

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना अर्ज करता येणार

निवडणूक आयोगाने नुकतंच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील गाईडलाईन्स पाठवली आहे. त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना मतमोजणी संपल्याच्या सात दिवसाच्या आत त्यांना शंका असलेल्या बूथच्या ईव्हीएममधील मायक्रोचीप तपासण्यासाठी अर्ज करता येणार आहे. 

हा अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल आणि त्यास मंजुरी मिळाल्यास निवडणूक आयोगाकडून पाठवलेल्या अभियंत्यांच्यासमोर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना शंका असलेल्या आणि अर्ज केलेल्या बूथवरील ईव्हीएमची मायक्रोचीप तपासता येणार आहे.

ईव्हीएम मायक्रोचीप तपासण्यासाठी 40 हजारांचा खर्च

पण मायक्रोचीप तपासायचे असेल तर उमेदवारांना मोठी रक्कमही खर्च करावी लागणार आहे. प्रत्येक ईव्हीएम आणि त्याच्या मायक्रोचीपच्या तपासणीसाठी उमेदवाराला चाळीस हजार रुपये भरावे लागणार आहे. म्हणजेच एखाद्या उमेदवाराने 10 मशीनमधील मायक्रोचीप तपासण्याचं अर्ज केला असल्यास आणि त्याचा अर्ज मंजूर झाला तर त्याला चार लाख रुपये भरावे लागतील. 

लोकसभेचा निकाल मंगळवारी

देशातील 543 आणि राज्यातील 48 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का की इंडिया आघाडी बाजी मारून सत्ता स्थापन करणार याचा निकाल लागणार आहे. 

काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोठा आरोप केला. गृहमंत्री अमित शाहांनी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले अशी सोशल मीडियावर त्यांनी पोस्टही टाकली. जयराम रमेश यांच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेत त्यांना पत्र लिहिले. केलेल्या दाव्यासंबंधीचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. तसंच कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने धमकावल्याची तक्रार दिली नसल्याचंही आयोगाने नमूद केलंय.

निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर जयराम रमेश यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते हा दावा कुठल्या आधारे करत आहेत याची माहिती देतील अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे 1आठवड्याचा वेळ मागितला. आयोगानं ही मागणी फेटाळली आणि आज 7 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. त्यावर निवडणूक आयोग निष्पक्ष असलं पाहिजे असा टोला जयराम रमेशांनी लगावला.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
Embed widget