एक्स्प्लोर

अजितदादा म्हणाले होते, लाईट बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही, आता बिलं का आली, कैलास पाटलांचा सवाल

Kailas Patil : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेतील शेतकऱ्यांना थकबाकीची बिलं येत असल्याचं पुराव्यासह मांडलं.

मुंबई :  महायुती सरकारनं राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली होती. निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटी बिलं वाटण्यात आली . निकालानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळं लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारनं याबाबत स्पष्टता द्यावी, असं कैलास पाटील म्हणाले.   

कैलास पाटील काय म्हणाले?

महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलं आहे. सरकारनं निवडणूक काळात मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासनं दिली. खोटी बिलं वाटली. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल दिलं गेलं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो पाहायला मिळतात. कैलास पाटील यांनी एका शेतकऱ्याचं वीज बिल दाखवलं, त्याला निवडणुकीपूर्वी झिरो बिल होतं. डिसेंबरचं जे बिल आलं त्यात 1 लाख 12 हजाराच्या थकबाकीसह बिल देण्यात आलं, असं कैलास पाटील म्हणाले. 

एखादा शेतकरी लगेच विश्वास ठेवतो, तुम्ही विधानसभेत घोषणा केली. निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन बिलं वाटली. आता नंतर त्यांना थकबाकीची बिलं येत असतील तर त्यांची भावना काय असेल, असं कैलास पाटील म्हणाले. प्रत्येक शेतकऱ्याला अशीच बिलं येत आहेत. याचं सरकारनं उत्तर द्यावं, असं कैलास पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना चालू बिल माफ केलंय की थकबाकीसह माफ केलंय, याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. मागची थकबाकी जर माफ केली असेल तर ही बिलं कशी येत आहेत, असं कैलास पाटील म्हणाले. 

 निवडणुकीनंतर  झिरो बिल ऐवजी शेतकऱ्यांच्या हातात थकीत वीज बिलाचा आकडा आला आहे.  लाखो रुपये थकीत बिल अचानक आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात शेतकऱ्यांचे वीज बिल घेऊन मुद्दा मांडला. थकित वीज बिल न भरल्यास मागेल त्याला सौर पंप योजनेचा लाभ मिळणार नसल्याच शेतकऱ्याला सांगितले जात असल्याचं कैलास पाटील यांचा म्हणणं आहे 

मागील वर्षी  निवडणुकीआधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून झिरो बिल दिले आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. कैलास पाटील यांनी निवडणुकआधी एका शेतकऱ्याला दिलेलं झिरो बिल आणि आता फेब्रुवारी महिन्यातलं बिल एक लाख 12 हजार रुपये आल्याचं दाखवलं. 

अजित पवार यापूर्वी काय म्हणालेले?

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात 2 ऑगस्ट 2024 ला माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे. तुम्हाला माहितीये आज साडे सात हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज दिली.पाच वर्षाची ऑर्डर परवा काढली. तीन वर्षांनी पुन्हा आढावा घेणार आहे. माझ्या शेतकऱ्यांनी वीज वापरावी, लाईट बील द्यायचं नाही. विरोधक फेक राजकारण करत आहेत.आम्ही  हे सगळं करतोय समाजाच्या भल्यासाठी करतोय. एवढी चांगली वीज माफीची योजना विरोधक म्हणतात हा निवडणुका जवळ आल्या म्हणून चुनावी जुमला, चुनावी जुमला, अरं कशाचा चुनावी जुमला..आम्ही शब्दाचे पक्के आहोत ना, आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत, पुढं पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं अजित पवार म्हणाले होते.

इतर बातम्या :

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
Embed widget