एक्स्प्लोर

Jayant Patil: समारोपाच्या भाषणात जयंत पाटील भावूक, आवंढा गिळून बोलायचे थांबले, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना हात दाखवून शांत बसवलं

Jayant Patil: जयंत पाटील हे सात वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार झाले आहेत. आता शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील.

Jayant Patil NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाच्या मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात आली. तब्बल सात वर्षे राष्ट्रवादीच्या (NCP) प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पाटील यांनी ही सूत्रं शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली. यावेळी समारोपाच्या भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) हे काहीसे भावनिक झाले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात आपण पक्षासाठी किती निष्ठेने आणि एकरुप होऊ काम केले, हे सांगितले. त्यांनी म्हटले की, 'त्यादिवशी मी माझ्या बायकोला सांगितलं की, सात वर्षे झाली, पण एकदा पण सुट्टी काढली नाही आपण. मी म्हटलं शेवटी उद्देश हा ...', या वाक्यानंतर जयंत पाटील हे प्रचंड भावूक झाले. त्यांना रडू आले पण त्यांनी आपल्या भावनांना आवर घालत आवंढा गिळला. त्यानंतर काही काळ जयंत पाटील हे काहीच बोलू शकले नाहीत. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणबाजी सुरु केली. तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी हात उंचावून जयंत पाटील यांच्या समर्थकांना शांत राहण्याची सूचना केली. यानंतर जयंत पाटील यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यांनी म्हटले की, 'दोन दोन खासदार असलेला भाजप जर इतका मोठा होऊ शकतो तर 10 आमदार आणि खासदार  असलेला आपला पक्ष का मोठा होऊ शकत नाही? हे सतत सर्वांनी कायम मनात ठेवा', असा सल्ला जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

माझी कोणतीही संघटना नाही, वेगळा गट नाही, असलं पाप कधी केलं नाही. २ हजार ६३३ दिवस मी प्रदेशाध्यक्ष आहे. आता पदावरुन बाजूला व्हायची ही योग्य वेळ आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

अजित पवारांसह अनेकांनी साथ सोडल्यानंतरही जयंत पाटील हे शरद पवारांशी कायम एकनिष्ठ राहिले होते. पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची मनधरणी करताना भावूक झालेले जयंत पाटील अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले होते. तरीही अलीकडच्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी राहूनही जयंत पाटलांच्या भाजपप्रवेशाची चर्चा होत असते. मंत्रिमंडळाच्या टॉपच्या खात्यावरून जयंत पाटलांचा भाजप प्रवेश रखडल्याचे बोलले जात आहे. खुद्द जयंत पाटलांनी ही चर्चा फेटाळली असली तरी आता पदमुक्त झाल्यानं त्यांची वाटचाल काय असेल, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Sharad Pawar: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली

अखेर शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवलीय. गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर असलेल्या जयंत पाटलांची जागा आता शशिकांत शिंदेंनी घेतलीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा एकप्रकारे विक्रमच केलाय...आता ते भाजपमध्ये जाणार की पवारांसोबतच राहणार, ही चर्चा सुरूच राहणार आहे. दुसरीकडे अतिशय कठीण काळात शशिकांत शिंदे यांच्यावर पदाची धुरा आलीय. आव्हानांवर मात करत शशिकांत शिंदे पक्षाला कशाप्रकारे नवी झळाळी देणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.

आणखी वाचा

टॉप 5 मधील मंत्रिपदासाठी भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा, जयंत पाटील हसत हसत म्हणाले, पराचा कावळा कशाला करता!

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget