एक्स्प्लोर

Farmer Protest Update: कृषी कायदे अंमलात आणताना मोदी सरकार कुठे चुकले? शरद पवार म्हणतात..

मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बारामती : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी दोन महिन्यांपासून अधिक काळ ठाण मांडून आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत चालले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कृषी कायद्याबाबत वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 पासून चर्चेला सुरुवात झाली होती. 2004 ते 2014 या काळात मी कृषीमंत्री होतो. त्या काळात या कायद्याबाबत सविस्तर चर्चा झाली. शेती हा घटनेनं राज्याचा विषय. त्यामुळं मी देशातल्या सर्व कृषीमंत्र्यांची बैठक घेतली आणि राज्यासाठी हा कायदा करण्याबाबत सर्वांची मते घेवून एक समिती केली. त्याचा एक मसूदा या समितीमार्फत बनवण्याचा निर्णय झाला. त्याची जबाबदारी त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह नऊ राज्यातील कृषीमंत्री यांच्यावर होती. त्यातून मसूदा तयार करुन तो राज्यांना कळवून त्यावर विचार करण्याबाबत सुचवण्यात आले. त्यानंतर नवीन सरकार आलं. आता फरक असा आहे की नव्या सरकारने थेट कायदाच तयार केला आणि तो संसदेत आणून गोंधळात पास करुन तो अंमलात आणला, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

राज्यांना विश्वासात न घेता कायदा मंजूर : पवार वास्तविक कायदा करताना चर्चा होणे आवश्यक होतं. जो विषय राज्याशी संबंधित आहे, तिथं राज्यांना अधिक विश्वासात घ्यायला हवं होतं. पण मोदी सरकारने कोणतीही चर्चा न करता, राज्यांना विश्वासात न घेता कायदा एकदम आणला. राज्यांचा विषय असताना केंद्रानं कायदे केले. या सगळ्या गोष्टींबद्दल माझी तक्रार आहे. शेती आणि त्यातील सुधारणांना आपला विरोध नाही. जिथं शक्य असेल तिथं बदल केलाच पाहिजे. यात काही गोष्टींबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. पण, त्यावर चर्चेने तोडगा निघू शकेल. परंतु, ज्यावेळी देशातील 4 ते 5 राज्यातील लोक 70-72 दिवस ऊन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता रस्त्यावर येतात तेव्हा सरकारनं संवेदनशील असलं पाहिजे.

माझं मत असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी अशा ज्येष्ठ मंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. पियुष गोयल आमचे मित्र आहेत. ते मुंबईचेच आहेत. पण मला पियुष गोयल आणि शेती यातलं काही फारसं माहिती नाही. माझ्या ज्ञानात भर पडली की पियुष गोयल हे शेतीचे तज्ञ आहेत म्हणून. पण मला असं वाटतं की हा विषय गांभीर्याने लक्षात घेवून, शेतकऱ्यांची अस्वस्थता पाहून यावर ज्येष्ठ मंत्र्यांनी लक्ष घालणं आवश्यक होतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget