एक्स्प्लोर

Farmer Protest Update: कृषी कायदे अंमलात आणताना मोदी सरकार कुठे चुकले? शरद पवार म्हणतात..

मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बारामती : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी दोन महिन्यांपासून अधिक काळ ठाण मांडून आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत चालले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कृषी कायद्याबाबत वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 पासून चर्चेला सुरुवात झाली होती. 2004 ते 2014 या काळात मी कृषीमंत्री होतो. त्या काळात या कायद्याबाबत सविस्तर चर्चा झाली. शेती हा घटनेनं राज्याचा विषय. त्यामुळं मी देशातल्या सर्व कृषीमंत्र्यांची बैठक घेतली आणि राज्यासाठी हा कायदा करण्याबाबत सर्वांची मते घेवून एक समिती केली. त्याचा एक मसूदा या समितीमार्फत बनवण्याचा निर्णय झाला. त्याची जबाबदारी त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह नऊ राज्यातील कृषीमंत्री यांच्यावर होती. त्यातून मसूदा तयार करुन तो राज्यांना कळवून त्यावर विचार करण्याबाबत सुचवण्यात आले. त्यानंतर नवीन सरकार आलं. आता फरक असा आहे की नव्या सरकारने थेट कायदाच तयार केला आणि तो संसदेत आणून गोंधळात पास करुन तो अंमलात आणला, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

राज्यांना विश्वासात न घेता कायदा मंजूर : पवार वास्तविक कायदा करताना चर्चा होणे आवश्यक होतं. जो विषय राज्याशी संबंधित आहे, तिथं राज्यांना अधिक विश्वासात घ्यायला हवं होतं. पण मोदी सरकारने कोणतीही चर्चा न करता, राज्यांना विश्वासात न घेता कायदा एकदम आणला. राज्यांचा विषय असताना केंद्रानं कायदे केले. या सगळ्या गोष्टींबद्दल माझी तक्रार आहे. शेती आणि त्यातील सुधारणांना आपला विरोध नाही. जिथं शक्य असेल तिथं बदल केलाच पाहिजे. यात काही गोष्टींबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. पण, त्यावर चर्चेने तोडगा निघू शकेल. परंतु, ज्यावेळी देशातील 4 ते 5 राज्यातील लोक 70-72 दिवस ऊन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता रस्त्यावर येतात तेव्हा सरकारनं संवेदनशील असलं पाहिजे.

माझं मत असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी अशा ज्येष्ठ मंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. पियुष गोयल आमचे मित्र आहेत. ते मुंबईचेच आहेत. पण मला पियुष गोयल आणि शेती यातलं काही फारसं माहिती नाही. माझ्या ज्ञानात भर पडली की पियुष गोयल हे शेतीचे तज्ञ आहेत म्हणून. पण मला असं वाटतं की हा विषय गांभीर्याने लक्षात घेवून, शेतकऱ्यांची अस्वस्थता पाहून यावर ज्येष्ठ मंत्र्यांनी लक्ष घालणं आवश्यक होतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abdul Sattar VIDEO: यापुढे आम्हाला त्रास होणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली, माझ्या मुलाचा अर्ज मागे घेतो; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचा नूर पलटला
यापुढे आम्हाला त्रास होणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली, माझ्या मुलाचा अर्ज मागे घेतो; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचा नूर पलटला
कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला, मुलीचा अर्ज माघे घेतल्यानंतर महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट
कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला, मुलीचा अर्ज माघे घेतल्यानंतर महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Abhishek Banerjee : मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड
मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget