एक्स्प्लोर

Mahayuti clash: महायुतीत पुन्हा धुसफूस, शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईल्स CMO मध्ये अडकल्या, आदेश न निघाल्याने तीव्र नाराजी

Mahayuti Government: महायुतीत प्रचंड धुसफुस, शिंदे गटाच्या फाईल्स अडकल्या, आदेश न निघाल्याने तीव्र नाराजी. उदय सामंत यांनी सरकारच्या कारभाराबाबत नाराजी बोलून दाखवली

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात सुरु असलेली अंतर्गत धुसफुस आता शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. नव्या सरकारमधील मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) नेमण्याच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेनेचे मंत्री (Shivsena Ministers) प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडी नेमण्याच्या ऑर्डर रखडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भातील फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात (CMO Office) पडून आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बहुतांश मंत्र्यांना स्वीय सहाय्यक आणि ओएसडी यांच्याशिवाय कारभाराचा गाडा रेटावा लागत आहे. त्यामुळे या मंत्र्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकदा मागे लागूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री कार्यालयावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आल्यानंतर भाजपने स्वीय सहाय्यक आणि ओएसडींच्या नेमणुकीसाठी नवी पद्धत वापरायचे ठरवले होते. त्यानुसार आता प्रत्येक मंत्र्याकडे नेमण्यात येणाऱ्या पीए आणि ओएसडीची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. या परीक्षेतून तावून सुखाखून बाहेर पडल्यानंतरच संबंधित पीए आणि ओएसडींची नेमणूक केली जाणार आहे. या चाळणीमुळे अद्याप शिंदे गटाच्या मंत्र्यांना पीए आणि ओएसडी मिळू शकलेले नाहीत. यामध्ये संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. 

उदय सामंतांची नाराजी

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओ यांच्याजवळ नाराजी व्यक्त करत पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत नाराजी पत्रात व्यक्त केली आहे.

धोरणात्मक निर्णय, महत्त्वाचे कामकाजाबाबत आणि  कामकाजाविषयी सचिव उद्योग तसेच मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी यांनी नियमित ब्रिफिंग करावी. याची दक्षता घ्यावी असा सज्जड दमचं पत्रातून अधिकाऱ्यांनी भरला आहे.अधिकारी परस्पर कारभार करतात, मंत्र्यानाही विश्वासात घेत नसल्याची खंत सामंतांनी पत्रातून बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रत्येक मंत्र्याकडे समन्वयक नेमणार

महायुती सरकारमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे सांगून त्याकरिता पक्षाकडून प्रत्येक मंत्री महोदयांकडे एक स्वीय सहाय्यक हा पक्षाच्या कामासाठी 'समन्वयक' म्हणून नियुक्त केला जाणार आहे. जिल्ह्यातील विकासकामे आणि कार्यकर्त्यांची कामे सुलभ पद्धतीने व्हावीत यासाठी भाजपने समन्वयक पदाच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश काढले होते. तसेच महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रही त्यांनी प्रसिद्ध केले होते. 

आणखी वाचा

मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंच्या 3 लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीसांचा ब्रेक? 'आनंदाचा शिधा', 'शिवभोजन थाळी' बंद होणार

महत्त्वाच्या बातम्या

SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुज, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुज, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget