Nagpur News : भाजप-सेनेच्या आमदारांना आरएसएसकडून रेशीमबागेत अल्पोपहार; शिंदे- फडणवीसांची एकत्र 'कॉफी'वर चर्चा
RSS ने आयोजित केलेल्या बौद्धिकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकत्र येत सोबत कॉफी घेतल्याचे बघायला मिळाले. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाल्याची माहिती आहे.

RSS Bauddhik नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) नागपुरात आज बौद्धिकाचे (RSS Bauddhik) आयोजन केलंय. या बौद्धिकाला महायुतीतील भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (MahaYuti) आमदारांना आमंत्रित केलं आहे. रेशीमबागेतील डॉ.हेडगेवार स्मृतीस्थळावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलंय दरम्यान, समाधीस्थाळाचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थित सर्व आमदार आणि मंत्र्यासाठी महर्षी व्यास सभागृहाच्या तळमजल्यावर अल्पहाराचे आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकत्र येत सोबत कॉफी घेतल्याचे बघायला मिळाले. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis and Eknath Shinde: रेशीमबागेत अल्पोपहार; शिंदे- फडणवीसांची एकत्र 'कॉफी'वर चर्चा
नागपूरच्या रेशीमबागेत सर्व नेत्यांनी सरसंघचालकांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर महर्षी व्यास सभागृहाच्या खाली तळमजल्यात असलेल्या हॉलमध्ये सर्वांचा चहापान झाला. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रित बसून कॉफी घेतली. कॉफी घेतल्यानंतर दोघेही सोबतच बाहेर आले. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला धडक देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत महाराष्ट्र भाजपच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, आता दोन्ही पक्षांनी सबुराचा निर्णय घेत महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मीडियासमोर दोघेही वेगवेगळे बाहेर पडताना दिसून उगीच चर्चेला वाव मिळू नये, म्हणून हे ठरवून करण्यात आलं की काय? असा तर्क देखील राजकीय वर्तुळातून लावला जात आहे.
Eknath Shinde : रेशीमबागेत आल्यानंतर एक वेगळी अनुभूती येते
संपूर्ण जगात आरएसएसच्या शाखा आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेची विचारसरणी मिळतीजुळती आहे. सुरुवातीच्या काळात अनेकजण संघाच्या शाखेतून शिवसेनेत गेले आहेत. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. 100 वर्षे एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करते, प्रसिद्धीपासून दूर राहते. एखाद्या आपत्ती किंवा संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने काम करतात. आरएसएस ही लोकाभिमुख आणि राष्ट्रप्रेमी संघटना आहे. रेशीमबागेत आल्यानंतर एक वेगळी अनुभूती येते. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
- Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला काही अघटित घडलंच तर नागपूरच्या लोकांना पंतप्रधानपदाची संधी, भारताच्या राजकारणात भूकंप येणार? पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
- Bhandara : मंत्री गिरीश महाजन पुन्हा ठरले संकटमोचक; खासदार पडोळेंसोबत थेट मोबाईलवर चर्चा; कुडकुडत्या थंडीत सुरू असलेलं जलसमाधी आंदोलन तब्बल 6 तासांनी मागे





















