एक्स्प्लोर

Congress : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त रिंगणात? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मोठी खेळी करणार

Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मुंबईतील वांद्रे पश्चिमची जागा काँग्रेस लढण्याची शक्यता आहे.

मुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा येत्या 10 दिवसांमध्ये पूर्ण होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. मुंबईतील विधानसभेच्या  36 जागांबाबत देखील महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप समोर आलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मुंबईतील 6 पैकी 4 जागा जिंकत महायुतीला धक्का दिला होता. मुंबई उत्तर मध्य लोकसा मतदारसंघात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्वल निकम यांना पराभूत केलं होतं. याच मतदारसंघात वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्व हे दोन मतदारसंघ येतात. यापैकी वांद्रे पश्चिममध्ये काँग्रेसकडून माजी खासदार प्रिया दत्त यांना उमेवारी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या वांद्रे पश्चिमचे विद्यमान आमदार आशिष शेलार आहेत. आशिष शेलार विरुद्ध प्रिया दत्त अशी निवडणूक होणार का हे जागावाटप झाल्यानंत स्पष्ट होईल. 

प्रिया दत्त यांना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसचा विचार आहे. प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. प्रिया दत्त यांचा या मतदारसंघात प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. प्रिया दत्त यांना उमेदवारी जिंकवून ही जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे काँग्रेसला वांद्रे पश्चिम मतदारसंघ दिल्यास वांद्रे पूर्वची जागा शिवसेना ठाकरे गटाला द्यावी लागण्याची शक्यता आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या  वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या. वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून चांगली मतं मिळाली होती. मात्र, भाजपच्या उज्वल निकम यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आघाडी मिळाली होती. उज्वल निकम यांना या मतदारसंघात मिळालेली आघाडी ही फार मोठी नव्हती. उज्वल निकम यांना 72593 मतं मिळाली तर वर्षा गायकवाड यांना 69 हजारांपेक्षा अधिक मितं मिळाली होती. त्यामुळं काँग्रेसच्या या विधानसभा मतदारसंघात यश मिळण्याबाबतच्या आशा वाढलेल्या आहेत. लोकसभेचा कल पाहता आशिष शेलार आणि प्रिया दत्त यांच्यात जोरदार लढत होऊ शकते. 

वांद्रे पूर्व जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडावी लागणार? 

वांद्रे पूर्व जागेवर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. आता, झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.  झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत विजय मिळला होता. आता राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना यावेळी मोठी आघाडी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर मविआला ही जागा जिंकण्याची आशा आहे.  मात्र, वांद्रे पूर्वची जागा विधानसभेला आपल्या पक्षाला मिळावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. 

इतर बातम्या:

निवडणुकीची रणधुमाळी लवकरच, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांवर लोकसभेला कुणाची आघाडी, मविआ की महायुती?

महत्त्वाच्या बातम्या

उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती; प्रत्यक्षात एका खासदाराशीच झालं बोलणं
उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती; प्रत्यक्षात एका खासदाराशीच झालं बोलणं
EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
BJP : सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, एसी बसमधून सहलीला रवाना
सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

व्हिडीओ

Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget