एक्स्प्लोर

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, "मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या जीआरचा कुणीही गैरफायदा घेऊ नये व बनावट प्रमाणपत्रे दिली जाऊ नयेत, यावर सरकार आणि शिष्टमंडळ यांचे एकमत झाले आहे.

मुंबई : मराठा समाजाला कुणबी (Maratha) प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी (OBC) मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी दिली. तसेच, राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता 10 ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला केल्याचे त्यांनी सांगितले. ​ओबीसी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास व बहुजन कल्याण दुग्धविकास मंत्री अतुल सावे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ओबीसी संघटनांचे सुमारे ४० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी माध्यमांना माहिती दिली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, "मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या जीआरचा कुणीही गैरफायदा घेऊ नये व बनावट प्रमाणपत्रे दिली जाऊ नयेत, यावर सरकार आणि शिष्टमंडळ यांचे एकमत झाले आहे. बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी काही अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिल्याचे पुरावे सादर केले. यावर, 'जर एखाद्या अधिकाऱ्याने खोटे प्रमाणपत्र दिले, तर त्याला तो अधिकारीच जबाबदार असेल आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल,' असे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले आहे." ​या बैठकीत केवळ प्रमाणपत्रांवरच नव्हे, तर 'महाज्योती'ला निधी, ओबीसी वसतिगृहे, विद्यार्थ्यांना उद्योगासाठी सवलती आणि कमी व्याजदराचे कर्ज यांसारख्या ओबीसी समाजाच्या इतर मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाली. याविषयीच्या श्वेतपत्रिकेबाबत संपूर्ण माहिती आल्यावरच यावर बोलता येईल असे बावनकुळे यांनी सांगितले.

ओबीसींचा ​मोर्चा मागे घेण्याचे आवाहन

राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनांनी १० ऑक्टोबर रोजी नियोजित केलेला मोर्चा परत घ्यावा, अशी विनंती आम्ही सर्वांनी शिष्टमंडळाला केली आहे. "ओबीसी शिष्टमंडळ आमची विनंती मान्य करेल, असा आम्हाला विश्वास आहे," असे बावनकुळे म्हणाले.

कुणाच्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही'

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीत सर्वांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, पण आरक्षणाचे निर्णय कायद्याच्या चौकटीतच होतील. "सरकारची भूमिका मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना न्याय देण्याची आहे. कुणाच्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे आणि कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची शासन पूर्ण काळजी घेईल," असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा

गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोननंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'शेतकरी भोळा आहे, पण मूर्ख नाही', Uddhav Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंची मागणी
Marathwada Tour 'अदानीच्या सिमेंटला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो का?', Uddhav Thackeray यांचा सवाल
Pune Land Scam: 'तोंडात किडे पडतील', सरकारची फसवणूक करताय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात
Vijay Wadettiwar on Parth Pawar : पुणे जमीन घोटाळ्याचे आरोप, वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Embed widget