एक्स्प्लोर

अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान?; छगन भुजबळांचं आश्चर्यकारक उत्तर, काँग्रेसलाही ओढलं

400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ  240  जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला पराभवाचा मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणेज सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील हेही अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर महायुती व 30 जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाला असून विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. स्पष्ट बहुमताचं सरकार असतानाही भाजपने अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीत घेतल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. आता, निवडणूक निकालानंतरही पुन्हा तो विषय समोर आला आहे. संघाच्या मासिकातून भापवर निशाणा साधण्यात आला.  त्यावर, आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ  240  जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय. संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपला झटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आणि शिदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी का केली, असा सवालही रतन शारदा यांनी लेखातून विचारला आहे. त्याच अनुषंगाने छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी स्पष्टपणे कुबली दिल्याचं पाहायला मिळालं. 

अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला, अशी टीका संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकातून करण्यात आली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, उत्तर देताना होय अशी कबुलीच भुजबळ यांनी दिली. ''त्यांनी अनेकांनी टीका केलेली आहे. काही लोकांनी तर काँग्रेसचे लोकं घेतल्यामुळेही टीका केलीय. काँग्रेसचे अशोक चव्हाण घेतले आहेत, मिलिंद देवरा घेतले आहेत, त्यांना राज्यसभेवरही पाठवलंय. आम्हाला देखील सोबत घेतलंय, ते म्हणतात ते एकंदरीत बरोबर आहे,'' असं आश्चर्यकारक उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं. तसेच, पण मला त्यांना असं म्हणायचंय, तुम्ही हे महाराष्ट्रातलं सांगता. मग, भारतातील इतर ठिकाणी काय झालंय, इतर ठिकाणीही सेटबॅक बसलेला आहे. त्यामुळे, नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना सोबत घेऊन आघाडी करावी लागली, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. 

80 ते 90 जागा द्यायच्यात त्या द्याव्यात

आमच्या महायुतीतील पक्षांनीही एकत्र येऊन काय तो जागावाटपाचा निर्णय घेतला पाहिजे. काय 80-90 ज्या जागा द्यायच्यात त्या द्याव्यात, असे म्हणत पुन्हा एकदा भुजबळांनी महायुतीच्या जागावाटपावर मत व्यक्त केलंय. दरम्यान, यापूर्वीही छगन भुजबळ यांनी जाहीर सभेतून महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकसमान जागा वाटप करावे, अशी मागणी केली होती, त्यांचे ते विधानही चांगलेच चर्चेत होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget