एक्स्प्लोर

BJP Vs Congress: काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करुन टाका! भाजपची आक्रमक रणनीती, चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

BJP Maharashtra: बावनकुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडण्याचा आदेश दिला. काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी निवडणुकीत तिकीट देताना तुमचा आधी विचार करणार असं आश्वासन दिले.

Pune BJP meeting: आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षात गेल्या दोन वर्षात उभी फूट पडली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) केलेल्या एका विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेसला (Congress) फोडा आणि पक्ष रिकामा करा, असा कानमंत्र बावनकुळेंनी भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पुणे जिल्हा भाजपच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांनी बोलताना हे वक्तव्य केले आहे. पुण्यात (Pune news) भाजपची कार्यकर्ता संवाद  बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

अलीकडेच भोरचे माजी आमदार आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी निवडणुकीत तिकीट देताना तुमचा आधी विचार करणार, असे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर भाजपची नजर आहे हा सवाल यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. पक्षफोडीच्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस नेत्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्याला मी काय करणार असं बावनकुळे म्हणाले. तर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांकडून अपेक्षा नसल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली.

मंत्रालयात या, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्तेचा फायदा करुन घ्यावा: बावनकुळे

19 मंत्र्यांना आम्ही आता प्रदेशासाठी पीए देतोय. जेणेकरुन तुम्ही कोणीही मंत्रालयात आले तरी तुमची गैरसोय होता कामा नये, याची काळजी घेऊ. भाजपचा एक कार्यकर्ता पूर्णवेळ तुमच्यासाठी बसेल. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम करुन देईल. संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला मंत्रालय आपलं वाटलं पाहिजे, आपलं सरकार, आपला मंत्री वाटला पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना वाटते, मंत्रालयात जाऊन काय बोलू. काँग्रेसवाल्यांना सत्तेचा फायदा करुन घेता येतो, भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा करुन घेता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आपण सरकारकडून काम करुन घेतलं पाहिजे. कोणीही निराश होऊ नका. प्रचंड ताकदीने काम करा.

भाजपकडे मोदी-फडणवीसांसारखे नेतृत्त्व असलं तरी निवडणूक जिंकायला त्यांना काँग्रेसचे नेतेच लागतात: हर्षवर्धन सपकाळ

भाजप पक्ष हा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. त्यांना माहिती आहे की, त्यांच्याकडे जरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेतृत्व सांगणारी जोडी असली तरी निवडणूक ही काँग्रेसच्याच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या जातात. त्यामुळे ते विरोधकांना फोडण्याचा षडयंत्र रचत आहेत. ज्याचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ते परभणीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 

आणखी वाचा

भाजपकडे मोदी-फडणवीसांसारखे मोठे नेते असले तरी निवडणूक जिंकायला त्यांना काँग्रेसवालेच लागतात: हर्षवर्धन सपकाळ

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
NCP Foundation Day : मोठी बातमी! एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार
मोठी बातमी! एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Rajya Sabha Bypoll : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज, मविआकडून अर्ज नाही; बिनविरोध निवड निश्चित
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज, मविआकडून अर्ज नाही; बिनविरोध निवड निश्चित

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget