एक्स्प्लोर

पुण्यात कामाला, परीक्षेसाठी परभणीत, कोठडीत जीव गमावेलेला सोमनाथ सूर्यवंशी कोण होता? जाणून घ्या A टू Z माहिती

परभणीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे.

परभणी : संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याचा दाव्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उफाळला. समस्त आंबेडकरी संघटना, आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi Death) या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता. मात्र आता शवविच्छेदनाच्या अहवालातून Shock following multiple injuries हे कारण समोर आल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. विरोधी पक्षाचे नेते पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतायत. असे असतानाच आथा सोमनाथ सूर्यवंशी हा तरूण नेमका कोण आहे? असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे या तरुणाबद्दल जाणून घेऊ या... 

शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे?

न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचे छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाची सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे. याच शवविच्छेदनातून सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. सुरुवातीला सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असाताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, असा दावा करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार सूर्यवंशीच्या मृत्यूचे कारण हे Shock following multiple injuries असे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सूर्यवंशीचा मृत्यू मार लागल्याच्या धक्क्यातून झाल्याचे शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे. 

परीक्षा देण्यासाठी आला होता परभणी शहरात 

सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता. त्याने परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला होता. सध्या त्याच परीक्षा चालू होती. त्यामुळेच तो पुण्यातून परभणीत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा एएलबीच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. तर सोमनाथ शूर्यवंशीच्या आधार कार्डवरील माहितीनुसार तो मूळचा पुण्याचा रहिवासी होता. त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते. त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता. तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायचा. 

प्रकाश आंबेडकर परभणीत दाखल

दरम्यान, सोमनाथच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी बाकावरील पक्षांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याची भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकर स्वत: परभणीत दाखल झाले आहेत.   

हेही वाचा :

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्काराला थांबणार; पोलिसांच्या कारवाईवर संशय, म्हणाले..

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget