एक्स्प्लोर

Palghar News : पालघरमधील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे फेसाळले, पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळं पालघरमधील धबधबे फेसाळले आहेत.

Palghar News : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही ठिकाणी तर नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अशातच पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळं पालघरमधील धबधबे फेसाळले आहेत. पालघरमधील जव्हार हे ठिकाण मिनी महाबळेश्वर समजलं जातं. पावसाळा सुरु झाला की येथील वातावरण रमनीय बनते. जव्हार भागातील हे एक पर्यटन स्थळ आहे. हा अति दुर्गम भाग असला तरीही येथील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे मनमोहक आहेत. तालुका अतिदुर्गम असला तरी निसर्गाच्या कुशीत वसलेले हे धबधबे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहेत.

जव्हार तालुक्यापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत दाभोसा आणि हिरडपाडा हे धबधबे आहेत. धबधब्याची उंची किमान 300 फुट आहे. या धबधब्याच्या ठिकाणी  सध्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई तसेच गुजरात, नाशिक आणि सिलवासा मधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्यावर येत आहेत. या धबधब्याच वैशिष्ठ म्हणजे हा धबधबा बाराही महीने सुरु असल्यानं पावसाळा नसतानाही पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो. मात्र वर्षा ऋतुत धबधब्या बाजूला असलेल्या हिरवाईमुळे या दोन्ही धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलुन दिसते. यामुळे पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येताना पहायला मिळतात.


Palghar News : पालघरमधील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे फेसाळले, पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

दाट धुकं आणि कोसळणारे धबधबे हे इथलं वैशिष्ट्य. नजर जाईल तिथे हिरवाईच हिरवाई दिसत असल्यानं बाराही महीने वातावरण प्रसन्न असतं. दाभोसा आणि हिरडपाडा या धबधब्यात जेवढ्या वेगाने आणि उंचीवरुन हे पाणी खाली पडते तितक्याच वेगाने त्याचे तुषार 50 ते 60 फुटांपर्यंत वर उडतात. चारही बाजुने डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर, सर्वत्र जंगल आणि नीरव शांतता तसेच धबधब्यातुन पडणाऱ्या पाण्याचा खळखळाट हे दृष्य खुप मनमोहक आणि विलोभनीय दिसते. त्यामुळं पर्यटकांकडून वेगळच समाधान व्यक्त केल जात. 

महत्वाच्या बातम्या:

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Kolhapur कोल्हापूरमध्ये 5 वर्षात विकास रखडल्याने महिला संतप्त
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्याची दैना, वाहतूक कोंडी, महिला असुरक्षित, तरुणींना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Dhule 'आमची पिळवणूक थांबवा', धुळेकरांनी वाचला समस्यांचा पाढा; कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mumbai : मुंबई महापालिका पुन्हा ठाकरेंकडे जाणार?, मुंबईकरांचा कौल कुणाला?
Pandharpur Update: २४ तास दर्शनानंतर विठुरायाला मिळणार आराम, प्रक्षाळ पूजेनंतर राजोपचार पुन्हा सुरू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Gujarat ATS arrests three ISIS terrorists: गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
Andheri : मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
Bacchu Kadu : राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी ही अवलाद...
राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले...
Embed widget