एक्स्प्लोर

Palghar News: पालघर जिल्ह्यात माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी प्रशासन अपयशी! 5 वर्षात आकडेवारीत घट मात्र स्थिती चिंताजनक

Palghar News: पालघर जिल्ह्यात बालमृत्यू आणि मातामृत्यूंमुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील पाच वर्षात मृतांची आकडेवारी घटली असली तरी काळजी करण्याजोगी आहे.

Palghar News: पालघर जिल्ह्याच्या (Palghar District) ग्रामीण भागात अजूनही आरोग्यवस्था बळकट झाल्याचे चित्र दिसून येत नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या पाच वर्षात बाल आणि माता मृत्यूंच्या प्रमाणात घट होत असली तरीही स्थिती काळजी करावी अशी आहे. पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि मातामृत्यूचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. वर्ष 2021-22 मध्ये तब्बल 294 बालमृत्यू आणि 20 मातांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर 2022-23 मध्ये ऑक्टोबरपर्यंत 151 बालमृत्यू तर 7 मातांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. यातील सर्वाधिक बालमृत्यू हे जव्हार, डहाणू आणि विक्रमगड या तालुक्यातील आहेत. या आकडेवारीमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.

पालघर जिल्ह्यात अपुऱ्या असलेल्या आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या अभावामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने यापैकी बहुतांशी बालकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबई , ठाणे आणि नाशिक या महानगरांलगत असलेल्या पालघरमध्ये आजही बाळ मृत्यू सारख्या गंभीर प्रश्नावर मात करण्यात प्रशासन आणि शासन हे दोन्हीही अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहेत.
 
तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालमृत्यू, माता मृत्यू, बेरोजगारी, कुपोषण यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, नवीन जिल्ह्याच्या निर्मितीनंतर आजही हे प्रश्न कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागात आजही आरोग्य सुविधा आणि दळणवळणाच्या सुविधांचा अभाव दिसून येत आहे. याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणांमुळे येथील बालकांना आणि गरोदर मातांना वेळेत उपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाल्याचही उघड झाले आहे.

आदिवासी विकास विभाग आणि शासनाच्या इतर विभागांमार्फत ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयी सुविधांसाठी वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांचा निधीही खर्च केला जातो. त्याचा गवगवा येथील लोकप्रतिनिधी नेहमीच करताना दिसून येतात. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असताना देखील आजही येथील दुर्गम भाग मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने हा निधी नेमका जातो कुठे असा सवाल येथील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पालघरच्या जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड या भाग आदिवासीबहुल विभाग आहे. या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांच्या विकास कामांमध्ये होणाऱ्या निधीतील अपहारांच्या आजपर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आजही सरकारकडून योग्य दखल घेऊन कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील विकास कामांवर खर्च होणाऱ्या निधीचा योग्य फायदा येथील तळागाळातील नागरिकांना होताना दिसून येत नाही. आता समोर आलेल्या बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या धक्कादायक आकडेवारीनंतर तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जाग येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

>> पालघरमधील आतापर्यंत बाल मृत्यू

> वर्ष 2014-15: बालमृत्यू  626 

> वर्ष 2015-16: बालमृत्यू  565 

> वर्ष 2016-17:  बालमृत्यू 557, मातामृत्यू 18 

> वर्ष 2017-18: बालमृत्यू 469, मातामृत्यू 19

> वर्ष 2018-19:  बालमृत्यू 348, मातामृत्यू 13

> वर्ष 2019-20:  बालमृत्यू 303,  मातामृत्यू 10

> वर्ष 2020-21: बालमृत्यू 296, माता मृत्यू 12

> वर्ष 2021-22: बालमृत्यू 296, मातामृत्यू 20

> वर्ष 2022-23: (ऑक्टोबरपर्यंत ) बालमृत्यू 151, मातामृत्यू 07 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Vasai Virar Rain Flood News: वसई-विरारमध्ये महापुराचा कहर; आजही जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान, 48 तासांत काय काय घडलं?
वसई-विरारमध्ये महापुराचा कहर; आजही जनजीवन विस्कळीत, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान, 48 तासांत काय काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Embed widget