एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : कुणी निसर्ग अनुभवत होतं, कोणी तो मोबाईमध्ये टिपत होतं, पण क्षणात सारं काही बदललं! गजबजलेल्या बैसरन व्हॅलीत शुकशुकाट; नुसत्या कल्पनेनं थरकाप

जम्मू-काश्मीरच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात अर्धवट खाल्लेले पदार्थ, बुटांचा टोप्यांचा आणि इतर अनेक पर्यटकांच्या खाणाखुणांसह निव्वळ भयाण शांतता असल्याचे चित्र या बघायला मिळाले आहे.    

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी नेहमी सारखाच दिवस उजाडला होता. बघता बघता सारी बैसरन व्हॅली (Baisaran Valley) पर्यटकांच्या गर्दीने दुमदुमी लागली. यावेळी कोणी मॅगी खातं होतं, कोणी कुटुंबासोबत सेल्फी काढत होतं, कुणी निसर्ग अनुभवत होतं, तर कोणी तो आपल्या मोबाईमध्ये अविस्मरणीय क्षण म्हणून टिपत होतं. मात्र ऐन सूर्य डोक्यावर आला असताना काश्मीर खोऱ्यात जे झालं त्याचा विचार ही कुणी केला नसेल. पोलीस वेशात काही दहशतवादी आले आणि एका एक गोळीबार सुरू केला. काही कळायच्या आता दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 20हून अधिक जण जखमी झालेत. काश्मीरला भेट देण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सर्व पर्यटकांनी कसा-बसा आपला जीव वाचवत सुरक्षित स्थळी आश्रय घेतला आणि सहल अर्धवट सोडून आपापल्या घरी परतले. हा सारा प्रसंग ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला ते हे क्षण कधीही विसरू शकत नाही.

 बैसरन व्हॅलीत पर्यटकांच्या खाणाखुणांसह उरलीय ती भयाण शांतता 

दरम्यान, ही दुर्देवी घटना होऊन आज 3 दिवसांचा काळ लोटला आहे. आज त्याच बैसरन खोऱ्यात सध्या शुकशुकाट पसरला आहे. हल्ला झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटकांसह याठिकाणी असलेले स्थानिक आणि व्यापारी देखील आपलं सगळं समान तिथल्या तिथे सोडून सुरक्षित स्थळी आश्रयाला गेले आहे. त्यामुळे आज या जागी अनेक अस्ताव्यस्त झालेल्या खाणाखुणा दिसत आहे.

कधीकाळी पर्यटकांच्या गर्दीने फुललेले भारताचे नंदनवन आज पुन्हा दहशतीची सावटाखाली आले आहे. दरम्यान, घटनेने या परिस्थितीवर पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवत काश्मीर खोऱ्यात सध्या सर्च मोहीम सुरू आहे. मात्र  बैसरन खोऱ्यात अद्यापही अर्धवट खाल्लेले पदार्थ, बुटांचा टोप्यांचा आणि इतर अनेक पर्यटकांच्या खाणाखुणांसह उरलीय ती भयाण शांतता, असेच एक चित्र या परिसराचे आहे.    

 

काळी पट्टी बांधून मुस्लिम बांधवानी अदा केली जुमाची नमाज

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ भाईंदर पश्चिमेच्या जामा मस्जिदमध्ये आज मुस्लिम बांधवानी जुमाच्या नमाज दरम्यान हातात काळी पट्टी बांधून नमाज अदा केली. आणि या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांची केलेली हत्या पाहता, देशातील सर्व नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

सर्वांची एकच मागणी आहे की दहशतवाद्यांना आणि दहशतवाद समर्थक पाकिस्तानला यावेळी कठोर धडा शिकवावा. देशातील मुस्लिम बांधवही या दहशतवादी घटनेने अत्यंत व्यथित झाले आहेत. आणि या घटनेला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर व त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करत असल्याचं मुस्लीम बांधवांनी यावेळी सांगितलं आहे. 

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Kailas Patil on Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Embed widget