एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाचा फायदा परराज्यातील शेतकऱ्यांना!
वसई : संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या शेतकरी संपाचा फायदा सुरत, दिल्ली, इंदूर, बेळगाव येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. भाजी मार्केटमध्ये सध्या भाज्यांचे भाव कडाडले असल्याने व्यापारी तसेच गृहिणींना भाजी खरेदी करताना डोईजड जात आहे. मात्र, वसई-विरार भागात गुजरात-सुरत येथील भाज्यांची रेलचेल दिसून येत आहे. तीही वीस ते तीस टक्के ज्यादा दराने.
वसई-विरार परिसरात अनेक भाजी मार्केट आहेत. येथे नाशिक, जुन्नर, वाशी येथील मार्केटमधून रोज भाज्यांचे ट्रक येतात. मात्र, सध्या शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या संपामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाजीमाल वाशी मार्केटमध्ये येत नाहीत.
ट्रकवाले आंदोलकांच्या हिंसक कृतीमुळे घाबरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संपाचा फायदा सध्या सुरत, दिल्ली, इंदोर, बेळगाव येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. येथून माल हा वाशीच्या मार्केटमध्ये येत आहे आणि तेथून व्यापारी हे ट्रकने वसई-विरार क्षेत्रात वितरीत करीत आहे.
शेतकऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील मेथी, पालक, वांगी, शेपू या गावठी भाज्या मिळत नाहीत. पण इतर राज्यातून येणारा भोपळा, सुरण, काकडी, भेंडी, परवर, सिमला, मिरची, आरवी, वटाणा, फ्लॉवर, कोबी, तोंडली, आलं हा भाजीपाला मिळत आहे.
भाज्यांचे दर वीस ते तीस टक्क्याने कडाडले आहेत. या कडाडलेल्या भावामुळे भाजीपाला विकणाऱ्या विक्रेतांची फार तारांबळ उडत आहे. गिऱ्हाईकांना वारंवार समजावून सांगावं लागतं आहे. तर सामान्य गृहिणीचंही महिन्याचं बजेट या वाढत्या दरामुळे पूर्णपणे कोलमडून गेलं आहे.
वसई-विरार परिसरातील भाज्यांचे दरपत्रक
- कोबी – 40 रु. किलो
- सिमला मिरची – 60 रु. किलो
- काकडी – 20 रु. किलो
- वांगी – 60 रु. किलो
- कोथिंबीर – 200 रु. जोडी
- भेंडी – 60 रु. किलो
- टोमॅटो – 80 रु. किलो
- फ्लॉवर – 40 रु. किलो
- मिर्ची – 120 रु. किलो
- आलं – 80 रु. किलो
- कांदा – 20 रु. किलो
- मटर – 120 रु. किलो
- फणसबी – 140 रु. किलो
- गवार – 80 रु. किलो
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
राजकारण
Advertisement