एक्स्प्लोर

Tuberculosis : उपचारासोबतच पोषक आहार घेतल्यास क्षयरोगाचा धोका आणि मृत्युचे प्रमाण होऊ शकते कमी

वाढत्या क्षयरोगाचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्याकरता पोषक आहार परिणामकारक ठरू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. केवळ पोषक आहाराच्या मदतीनेच देशात TB सारख्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो

Adequate Food Can Reduce Death In Tb Patient : भारत सरकार सध्या देशाला टीबीमुक्त करण्याकरता चांगलेच लक्ष देत आहे. 2050 पर्यंत संपूर्ण देशाला टीबीमुक्त करण्याचे भारत सरकारचे मोठे ध्येय आहे. एका अहवालानुसार मागच्या काही वर्षात क्षय रूग्णांची संख्या (Tb Patient) लक्षणीय वाढ पाहायला मिळाली होती. मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये तब्बल 21.42 लाख TB रूग्ण आढळले होते. तर या वर्षी TB च्या रूग्णसंख्येत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या वाढत्या क्षयरोगाचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्याकरता पोषक आहार परिणामकारक ठरू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. केवळ पोषक आहाराच्या मदतीनेच देशात TB सारख्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. देशात या संबंधित एक चाचणी करण्यात आली त्या चाचणीत असे आढळून आले की, पोषक आहार क्षयरोग टाळण्यास आणि आधीच संक्रमित झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते.

आॅगस्ट महिन्यात झारखंडमधील चार जिल्ह्यात केलेल्या परिक्षणात आढळून आले की, पोषणाची योग्य पद्धतीने घेतल्यास TB सारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होऊ शकतो. 'द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ'मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की हा उपाय क्षयरोगाचा धोका 48 टक्क्यांनी कमी करण्यात उपयुक्त ठरू शकतो.

या चाचणी अंतर्गत सहभागी झालेल्या लोकांना सहा महिन्यांकरता पोषक आहार देण्यात आला ज्यामध्ये 5 किलो तांदूळ , 1.5 किलो तूर डाळ आणि इतर पौष्टिक पदार्थ देण्यात आले. सोबतच TB ने ग्रस्त असणाऱ्या 2800 रूग्णांना देखील पोषक आहार देण्यात आला.  संशोधकांना असे आढळून आले की, ज्या लोकांना पोषक आहार देण्यात आला आहे, त्यांच्या शारिरीक स्थितीत मोठा बदल झाला आहे. यानंतर संशोधकांनी एक अहवाल सादर केला ज्यात लक्षात आले की. TB चे निदान झाल्यानंतर तात्काळ चांगला आहार रूग्णांना देण्यात आला तर मृत्यूचा धोका 60% कमी होतो.

संशोधक काय म्हणतात

 डॉ अनुराग भार्गव यांनी सांगितले की, कुपोषण आणि असंतुलित आहार या कारणांमुळे TB रूग्णांमध्ये मृत्युचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. कुपोषण हे TB होण्याचे महत्वाचे कारण ठरू शकते. दरवर्षी कुपोषणामुळे 40 % लोकांना
TB ची  लागण होते. तसेच मधुमेह , धुम्रपान ,मद्यपान यामुळे देखील TB होण्याची शक्यता असते.

उपचारासोबत योग्य पोषण देखील महत्त्वाचे आहे 

एनआयआरटी (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस), चेन्नई यांनी केलेल्या पूर्वीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 35 किलोपेक्षा कमी वजन असलेल्या क्षयरुग्णांचा मृत्यूदर 45 किलोपेक्षा जास्त वजन 
असलेल्या रुग्णांपेक्षा चार पट जास्त होता. म्हणजेच रुग्णांना वेळेवर उपचारासोबतच योग्य पोषण आहार मिळाल्यास मृत्यूही कमी होण्यास मदत होऊ शकते. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget