एक्स्प्लोर

Nashik News : मनमाडमार्गे प्रवास करताय, जरा थांबा! 29 जूनपर्यंत 46 रेल्वेगाड्या रद्द 

Nashik News Update : अंकाई किल्ल्याजवळ सुरू असलेल्या कामामुळे 46 गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

Nashik News Update : मनमाडमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मनमाडहून मुंबईकडे आणि मनमाडहून पुढे जाणाऱ्या रेल्वेगाड्या 29 जून पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास 46 रेल्वे गाड्ंयाचा समावेश असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

नाशिकमधील महत्वाचे रेल्वे जंक्शन मानले जाणाऱ्या मनमाड जवळील मनमाड-दौंड मार्गावर अंकाई किल्ला स्टेशन जवळ रुळाचे दुपदरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मनमाड मार्गे जाणाऱ्या तब्बल 46 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

अंकाई किल्ल्याजवळ सुरू असलेल्या कामामुळे 46 गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. यातील काही गाड्या 26, 27, 28 तर काही गाड्या 29 जून पर्यंत रद्द करण्यात आल्या असून त्यात राज राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी, गोदावरी यासह इतर गाड्यांचा समावेश आहे. 

एकाच वेळी तब्बल 46 गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. शिवाय अंकाई रेल्वे स्थानकाजवळ करण्यात येत असलेल्या कामाचा पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस या गाड्यांचा काही संबंध येत नसताना देखील त्या का रद्द करण्यात आल्या असा? प्रश्न नाशिक मुंबईकडे अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांसोबत सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.

दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात असून अनेक ठिकाणी रेल्वे रुळाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. मनमाड दौंड मार्गावर या अगोदर सिंगल रेल्वे लाईन होती. मात्र तिचे दुहेरीकरण केले जात असून जवळपास याचे काम पूर्णत्वास आले आहे. शेवटचा टप्पा अंकाई रेल्वे स्थानकाजवळ असून तो पूर्ण करण्यासाठी 29 जूनपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या 46 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या रेल्वे गाड्यांचा समावेश 

नांदेड- मनमाड एक्सप्रेस, मनमाड नांदेड एक्सप्रेस, मनमाड - मुंबई एक्सप्रेस, मुंबई-मनमाड एक्सप्रेस, काकीनाडा- शिर्डी, शिर्डी-काकीनाडा सिकंदराबाद- मनमाड एक्सप्रेस, मनमाड -सिकंदराबाद एक्सप्रेस, काचीगुडा एक्सप्रेस, दौंड-निजामाबाद निजामाबाद- पुणे, विशाखापटनम- साईनगर शिर्डी, शिर्डी-विशाखापट्टणम, शिर्डी- कालका, कालका- शिर्डी सीएसएमटी जालना, अजनी-पुणे, सीएसएमटी यासह इतर गाड्यांचा समावेश आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget