Raj Thackeray On Ashok Kharat Case: कुणाच्यातरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी अशोक खरात प्रकरणाचा वापर?; राज ठाकरेंचं बेधडक विधान, काय म्हणाले?
Raj Thackeray On Ashok Kharat Case : सध्या अशोक खरातची चौकशी सुरु असून यामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणामुळे राज्याचं राजकारणही ढवळून निघालंय.

Raj Thackeray On Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरला आहे. सध्या अशोक खरातची चौकशी सुरु असून यामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणामुळे राज्याचं राजकारणही ढवळून निघालंय. याचदरम्यान, अशोक खरात प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर बेधडक पोस्ट केली आहे. यामध्ये कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात असल्याचं माझ्या कानावर आलंय, असंही म्हटलं आहे.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray On Ashok Kharat Case)
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं- राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Kharat Case)
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च 2026 ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो. ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.
महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं- (Raj Thackeray On Ashok Kharat Case)
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
राज ठाकरेंची संपूर्ण पोस्ट-
घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा- (Ashok Kharat Case)
अशोक खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा. इतकंच नाही तर या नराधमाने चिंचोके विकून लोकांना वेड्यात काढलंय. भोंदूबाबा अशोक खरात एकेक चिंचोका 1 लाख रुपयांना विकत होता. चिंचोके मंत्रोच्चारीत असल्याची बतावणी खरात भक्तांना करायचा. अशोक खरातच्या निकटवर्तीयाच्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Ashok Kharat Case | अनेक महिलांची फसवणूक, अत्याचार, नकली नागाचा वापर, खरातचे कारनामे -























