एक्स्प्लोर

नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांत खदखद; मिसळ पार्टीतील नाराजीचा ठसका शिवतीर्थापर्यंत जाणार का?

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक संपताच नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काहीसे वेगळे चित्र दिसले. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या पक्षाने महायुतीला बिनशर्त बाठिंबा दिला. विशेष म्हणजे मसनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीच याची घोषणा करून कार्यकर्त्यांना महायुतीचे (Mahayuti) काम करण्याचा आदेश दिला. खुद्द राज ठाकरे यांनीदेशील महायुतीच्या वेगवेगळ्या उमेदवारांच्या विजयासाठी जाहीर सभा घेतल्या. मात्र मनसे पक्षात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात मात्र वेगळीच भावना आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे ही सर्व नाराजी ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाली असून ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाखवली जाणार आहे. आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली

लोकसभा निवडणुकीतील कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा आणि आगामी विधानसभा, मनपा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी खास मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीच्या निमित्ताने अधिकाधिक कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हावे यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात बोलवण्यात आले नव्हते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांची सुरुवातीपासून साथ देणारे कार्यकर्ते उपस्थित होते. या मिसळ पार्टीत वेगेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच कार्यकर्त्यांनी त्यांच्या अडचणी बोलून दाखवल्या. ही सर्व चर्चा कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली असून ती राज ठाकरे यांना दाखवली जाणार आहे.   

या पार्टीच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपताच मनसेच्या कार्यकर्त्यांची खदखद बाहेर आली आहे. या कार्यकर्त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ऑन कॅमेरा कार्यकर्त्यांनी त्यांच्या या भावना व्यक्त केल्या आहेत. या पार्टीला दोनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या मिसळ पार्टीतील नाराजीच्या फोडणीने मनसेच्या पक्षात चांगलाच ठसका पसरल्याचे बोलले जात आहे. 

नाशिककडे लक्ष द्यावे, कार्यकर्त्यांची मागणी

नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी उघड नाराजी व्यक्त केली. तसेच या नाराजीची राज ठाकरे यांनी दखल घ्यावी. नाशिक जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पदरमोड करत स्वतःच्या खर्चातून महायुतीचे काम केले. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, अशी खदखद अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. 

राज ठाकरे काय निर्णय घेणार?

दरम्यान, नाशिक जिल्हा कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. नाशिकच्या महापालिकेवर मनसेची सत्ता होती. त्यामुळे नाशिक मनसेच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. पण आता नाशिकमधील कार्यकर्ते नाराज आहेत. याची राज ठाकरे काय दखल घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा :

शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा; अमित शाहांचं सूचक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget