एक्स्प्लोर

Dhananjay Munde : 'कंत्राटी नोकर भरतीचं पाप उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारने केलं', नाशिकमध्ये धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

Nsshik Dhananjay Munde : कंत्राटी भरती संदर्भात तत्कालीन महाविकास सरकारवर मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

नाशिक : 'सुशिक्षित बेरोजगार तरुण बंधूभगिनींच्या भरतीच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठं पाप उबाठाने केलं, महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने केलं. त्यावेळेस आम्ही विरोध केलेला, याबाबत आमच्याकडे नोंद आहे. पण या सगळ्या गोष्टी विरोध केलेला असताना सुद्धा ज्यांनी पाप केलं, त्यांचं पाप उघडं पडले'. म्हणून महाविकास आघाडीच्या त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्या काळातल्या सहकाऱ्यांनी मिळून हा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप धंनजय मुंडे (Dhananjay Mudne) यांनी केला. 

आज नाशिकमध्ये (Nashik) कृषिमंत्री धनंजय मुंडे आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरती संदर्भात महत्वाची घोषणा केली. यावर धनंजय मुंडे यांनी प्रकाश टाकत त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या आघाडी सरकारमध्ये खुद्द धनंजय मुंडे हे देखील सहभागी होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, कंत्राटी भरती संदर्भात कोणताही निर्णय नाही, आजच फडणवीसांनी याबाबत स्पष्ट केले. त्यामुळे कृपा करून कशालाही बळी पडू नका, हे सरकार सुशिक्षित बेरोजगार बंधू भगिनींच्या पाठीमागे ताकदीने उभा आहे आणि सर्वच्या सर्व जागा या सरकारी पद्धतीने भरती केल्या जाणार आहेत. कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका, सरकार पूर्णपणे सरकारी नोकरीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना नियमाने सामावून घेणार असल्याचे देखील धनंजय मुंडे म्हणाले. 


धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, तरुण सुशिक्षित बेरोजगार बंधू-भगिनींना माझं या माध्यमातून सांगणं आहे की, हे सरकार पूर्णपणे सरकारी रोजगार देण्यासाठी बांधील आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नाही, तर सरकारमध्ये ज्या पद्धतीने, जशा जागा निघतील आणि निघतात, त्या पद्धतीने सरकारी भरती केली जाणार आहे. हा निर्णय जेव्हा झाला, त्यावेळी मधल्या काळात मुंबईमध्ये पोलीस भरती (Police Bharati) चालू झाली, त्यावेळेसही या सरकारवर, गृह विभागावर आरोप करण्यात आले की, पोलीस भरती सुद्धा कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. माझी महाराष्ट्रातल्या सर्व सुशिक्षित बेरोजगारांना बंधू-भगिनींना माझी हात जोडून विनंती अशा कुठल्याही वायफळ गोष्टीवर विश्वास ठेवू नका, गृह विभागांनी या ठिकाणी 18000 पदाची पोलीस भरती केली. 

कंत्राटी भरती महाविकास आघाडीचं पाप 

दरम्यान ती पोलीस भरती केल्यानंतर प्रत्यक्ष पोलीस भरती झाल्यापासून ते त्याला पोस्टिंग मिळेपर्यंत एक वर्षाचा काळ जातो, त्या एक वर्षाच्या काळात ही 18000 पदं पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या देण्यासाठी जी आवश्यक असतात ती पद महाराष्ट्र सरकारच्या बोर्डाकडून दिले गेल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. म्हणजे हे महाराष्ट्राचं सरकारचं बोर्ड असून त्या बोर्डातील काही लोकांकडून एक वर्षाच्या काळाच्या दरम्यान भरती प्रक्रियेच्या दरम्यान ड्युटी दिली गेली. पण आज लाज वाटली पाहिजे की, सुशिक्षित बेरोजगार तरुण बंधू भगिनींच्या भरतीच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठं पाप ज्या उबाठाने केलं, ज्या महाविकास आघाडी सरकारने केलं. त्यावेळेस आम्ही विरोध केलेला, याबाबत आमच्याकडे नोंद आहे. पण या सगळ्या गोष्टी विरोध केलेला असताना सुद्धा ज्यांनी पाप केलं, त्यांचं पाप उघड पडले. म्हणून महाविकास आघाडीच्या त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्या काळातल्या सहकाऱ्यांनी मिळून हा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप धंनजय मुंडे यांनी केला. 

इतर महत्वाची बातमी : 

Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jackie Shroff on Bhidu : परवानगीशिवाय 'भिडू' शब्द वापरण्यावर आक्षेप, जॅकी श्रॉफ कोर्टात ABP MajhaAaditya Thackeray on MNS : ...म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला का? काकांच्या कार्यकर्त्यांना थेट सवाल...Sharad Pawar Ghatkopar Hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी शरद पवार दाखल, अपघाताची घेतली माहितीGhatkopar Bhavesh Bhinde Absconded : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे फरार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Embed widget