एक्स्प्लोर

Nashik Water Issue : नाशिक मनपा हद्दीतील तिरडशेत तहानेने व्याकुळ, महिलांचा संताप अनावर 

Nashik Water Issue : नाशिक शहराला (Nashik City) पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर (Gangapur Dam) धरणाला लागून असूनही, मनपा हद्दीतील तिरडशेत या गावातील नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रस्त आहेत.

Nashik Water Issue : अवघ्या नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नाशिक मनपा हद्दीतील तिरडशेत हे गाव तहानेने व्याकुळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर संतापलेल्या महिलांनी रास्ता रोको करत आपला आक्रोश व्यक्त केला. त्यामुळे मनपा हद्दीत असून 'पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. 

नाशिक शहराला (Nashik City) पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाला लागून असूनही, नाशिक महानगरपालिका (Nashik Muncipal Corporation) हद्दीतील तिरडशेत या गावातील नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रस्त आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती तिरडशेत येथे निर्माण झाली आहे. याचाच निषेध करण्या करिता हजारो महिलांनी रस्त्यावर उतरत हंडा मोर्चा काढला. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रास्ता रोको करत पाणी प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे काही काळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. 

एकीकडे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ सुरगाणा, इगतपुरी या तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना मनपा हद्दीतील गावात पाणीटंचाईचा प्रश्न पुढे आला आहे. नाशिकपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तिरडशेत गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. सध्या सात ते आठ दिवसानंतर मनपाचे पाणी येते. मात्र अनेकदा येथील महिलांना पिंपळगाव बहुला येथे पाणीसाठी धावाधाव करावी लागत आहे. यासाठीचा संताप उफाळून आल्यानंतर आज महिलांनी रास्ता रोको करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

अधिकाऱ्यांची धावाधाव 
काही वर्षांपासून तिरडशेत येथे पाण्याची समस्या आहे. त्यामुळे येथील महिला जवळील पिंपळगाव बहुला येथे पायपीट करून पाणी आणतात. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आज सकाळी गावातील महिलांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. पाण्याचा प्रश्न सुटत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला. दरम्यान प्रशासनाने याची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली आहे. 

नाशिक-त्र्यंबक रस्ता जॅम 
गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याने महिलांचा संयम सुटला आहे त्यामुळे त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने अनेकांचे नियोजन यावेळी कोलमडले. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget