एक्स्प्लोर

Suhas Kande : उपमुख्यमंत्री साहेब, गोलमाल उत्तर देऊ नका, 'त्या' माजी मंत्र्यांचा सोक्षमोक्ष लावा, आमदार सुहास कांदे आक्रमक 

Suhas Kande : सुहास कांदे (Suhas Kande) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना महाराष्ट्र सदन घोटाळयासंदर्भात (maharashtra Sadan) योग्य सोक्षमोक्ष लावण्याची विनंती केली आहे.

Suhas Kande : सुहास कांदे (Suhas Kande) आणि भुजबळ (chhagan Bhujbal) वाद राज्यात सगळ्यांनाच सर्वश्रुत आहे. गेल्या काही महिन्यापासून म्हणजेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असल्यापासून हा वाद सुरु आहे. त्यावेळी थेट हा वाद तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यापर्यंतही पोहचला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद काही अंशी मिटवला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशना दरम्यान हा वाद उफाळून आला आहे. यावेळी सुहास कांदे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना याबाबत जाब विचारात या वादाचा सोक्षमोक्ष लावण्याचा तगादा लावला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे सुहास कांदे यांचे समाधान झाले नाही. 

यावेळी सुहास कांदे यांनी सुरवातीलाच 2015 च्या सुमारास झालेल्या महाराष्ट्र सदन घोटाळयाचा (Maharashtra Sadan Scam) लेखाजोखा मांडत लक्षवेधी मांडली. यावेळी ते म्हणाले कि अंजली दमानिया (Anjali Damaniya) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी अंधेरी आरटिओ आणि महाराष्ट्र सदन संदर्भात तक्रार दाखल केली होती. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. या संदर्भात खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. जवळपास हा घोटाळा 1160 कोटी रुपयांचा आहे, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे प्रकरण मागे घेण्यात आले आणि त्यात तत्कालीन मंत्री असलेले नेत्यांना निर्दोष सोडण्यात आले. त्यानंतर मंत्री महोदयाचे मतदार संघात जोरदार स्वागतही करण्यात आले. जस काही ते पाकिस्तानच्या बोर्डावर लढून आले. 

ते पुढे म्हणाले नंतर विधी विभागाने एक शासन निर्णय काढला की उच्च न्यायालयात अपील करायचे. मात्र त्याच विधी विभागाने पुन्हा पत्र काढून अपील करण्याची गरज नसल्याचे सांगितले. अस काय झाल की विधी विभागाला आपला निर्णय बदलावा लागला, असा सवाल देखील यावेळी कांदे यांनी उपस्थित केला. विधी व न्याय विभागाने कोणाच्या दबावाखाली हे पत्र काढल? याची चौकशी होणार का? का ते ते माजी मंत्री बाहूबली आहेत, त्यांनी ब्लॅकमेल केल का? असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित करत या संदर्भात आपण पुन्हा अपील करणार करणार असल्याचे सुहास कांदे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान सुहास कांदे यांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, हे दोन जीआर रद्द करण्याचा निर्णय अधिकारी यांनी घेतला नाही. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात केला आहे. त्यामुळे याची पुन्हा तपासणी करता येते का हे पाहिलं जाईल तसेच पुन्हा अपील करता येईल का या संदर्भात चौकशी केली जाईल, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सुहास कांदे यांना दिले. मात्र या उत्तरावर सुहास कांदे यांचे समाधान झाले नाही.

फडणवीस यांच्या उत्तरावर कांदे आक्रमक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरावर आक्रमक होत सुहास कांदे म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस तुम्ही जे उत्तर दिलं आहे, त्यावर समाधानी नसून उद्धव ठाकरे यांनी असे निर्णय घेतल्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आलो आहे. तसेच आम्ही तुमच्याकडे बघून आलो आहे. त्यामुळे गोलमोल उत्तर देणार देऊ नका. आणि जर समजा तुम्ही आधीच्या निर्णयाला स्थगिती देत असाल तर हे परिपत्रक काढले ते मागे घ्या, भ्रष्टाचार आपल्याला काढायचं असेल तर हा निर्णय रद्द केला पाहिजे, पंतप्रधान यांनी भ्रष्टाचार मुक्त घोषणा केली आहे, मग त्यांना पाठीशी का घातल जातंय? तुमच्याकडे बघून आम्ही तुमच्या सोबत आलो आहे, तेव्हाच्या सरकारमध्ये चांगली काम झाली नाही म्हणून आम्ही इथे आलो, असे सणसणीत उत्तर यावेळी सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Flood: नाशिककरांनो काळजी घ्या! गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; संध्याकाळपर्यंत नदी धोक्याची पातळी ओलांडणार
नाशिककरांनो काळजी घ्या! गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; संध्याकाळपर्यंत नदी धोक्याची पातळी ओलांडणार
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Maharashtra Weather Rain Updates: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
Embed widget