एक्स्प्लोर

Nashik Bullock Cart Race : नाशिकच्या ओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थांचा निर्णय 

Nashik Bullock Cart Race : नाशिकच्या (Nashik) ओझरमध्ये आयोजित केलेली बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आली आहे.

Nashik Bullock Cart Race : नाशिकच्या (Nashik) ओझरमध्ये आयोजित केलेली बैलगाडा शर्यत आता रद्द करण्यात आली आहे. लम्पि आजाराच्या प्रादुर्भावामुळे ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला असून प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर यावर विचार केला जाणार आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरवर्षी नाशिकजवळील ओझर (Ojhar) परिसरात खंडोबा यात्रेच्या (Khandoba Yatra) निमित्ताने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येते. खंडोबाची यात्रा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात राज्यभरातून बैलगाडा शर्यत प्रेमी ओझर मध्ये दाखल होतात. मात्र राज्यासह जिल्ह्यात लम्पि आजाराचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खंडोबा यात्रेनिमित्त होणारी शर्यत आता रद्द करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात लम्पिचा (Lampy) प्रादुर्भाव असून यासाठी पशु संवर्धन विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. याच प्रादुर्भावाचा विचार करता प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. खंडोबा यात्रेनिमित्त या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले गेले होते. खंडोबाची यात्रा असते आणि त्यानंतर या बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते.

गेल्या काही महिन्यांपासून लम्पि आजाराने अनेक जनावरांचा मृत्यू झालेला आहे. ही साथ फोफावत असल्याने ओझर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी आयोजकांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय एक मुखाने  घेतलेला आहे. जोपर्यंत लम्पि ची साथ कमी होत नाही, तोपर्यंत पुन्हा बैलगाडा शर्यत चे आयोजन करण्यात येणार नाही, त्यामुळे सध्या तरी ही बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द करण्यात आलेली आहे. जोपर्यंत संपूर्ण लम्पि आजाराचा नायनाट होत नाही, तोपर्यंत शर्यत बंद राहणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने की यात्रा घेतली जाणार आहे.

नाशिकमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव 
नाशिक जिल्ह्यात लम्पीच्या साथीने आतापर्यंत 83 जनावरे दगावली आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी शासकीय मदतीबाबत सतर्क राहून आतापर्यंत 75 प्रस्ताव यशस्वीपणे पूर्ण केल्याने जिल्ह्यातील 75 पशुपालकांना 19 लाख 39 हजार रुपयांची मदत थेट बँकेत जमा झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 692 जनावरांना बाधा झाली असून त्यापैकी 01 हजार 309 जनावरे पूर्णपणे अंबरी झाली आहेत. जिल्ह्यातील 300 जनावरे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर जिल्ह्यात 99.99 टक्के लसीकरण झाले आहे. 

मागील वर्षीची वादग्रस्त बैलगाडा शर्यत 
दरम्यान मागील वर्षी ओझर शहरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र विनापरवानगी ही बैलगाडा शर्यत आयोजित केल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे अमोर आले होते. अखेर पोलिस प्रशासनाच्या हस्तक्षेपाने शर्यत अखेर बंद करण्यात आली होती. तर त्याच सुमारास दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर शिवारात विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीलाही हजारो जणांची उपस्थिती आणि शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
Defence Minister Rajnath Singh: भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
एअर इंडियाचा Freedom Sale, फक्त 1,279 रुपयात विमान प्रवास, 4,279 रुपयात परदेश प्रवासाची संधी; काय आहे सवलत?
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती 
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
आता विमानासारखा ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॅक बॉक्स लावावा लागणार? ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने कोल्हापुरातून पहिला विरोध
Defence Minister Rajnath Singh: भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
भारत एक दबंग आणि गतिमान अर्थव्यवस्था आहे, म्हणून काही बाॅस जळतात : राजनाथ सिंह
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
नितीन गडकरी तेव्हा म्हणाले, 'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' आता तोच धागा जोडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरींना पाडायचा निर्णय झाला होता
Rahul Gandhi on Election Commission:'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु
आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही! त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? रोहित पवारांचा हल्लाबोल
आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही! त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? रोहित पवारांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Embed widget